Home नांदेड नियमाच्या काटेकोर अंमलबजावणीसह कोणावरही अन्याय होणार नाही याची दक्षता घ्या – जिल्हाधिकारी...

नियमाच्या काटेकोर अंमलबजावणीसह कोणावरही अन्याय होणार नाही याची दक्षता घ्या – जिल्हाधिकारी डॉ. विपीन इटनकर

44
0

आशाताई बच्छाव

IMG-20220723-WA0014.jpg

नियमाच्या काटेकोर अंमलबजावणीसह कोणावरही अन्याय होणार नाही याची दक्षता घ्या – जिल्हाधिकारी डॉ. विपीन इटनकर

1 लाख 47 हजार 67 शेतकऱ्यांच्या 81 हजार 943 हेक्टर क्षेत्राचे पंचनामे पूर्ण
• उर्वरीत पंचनामे पूर्ण करण्यासाठी जिल्ह्यातील संपूर्ण महसूल यंत्रणा शिवारात
नांदेड जिल्हा ब्युरो चीफ मनोज बिरादार (युवा मराठा न्यूज नेटवर्क)
नांदेड (जिमाका) दि. 22 :- नुकत्याच झालेल्या अतिवृष्टीत नांदेड जिल्ह्यातील 93 महसूल मंडळापैकी 80 महसूल मंडळातील चालू हंगामातल्या पिकांना क्षती पोहचलेली आहे. या 80 महसूल मंडळापैकी 61 महसूल मंडळात 2 वेळेस, 32 महसूल मंडळात 3 वेळेस, 12 महसूल मंडळात 4 वेळेस, 3 महसूल मंडळात 5 वेळेस, तर एका महसूल मंडळात 6 वेळेस अतिवृष्टी झाली आहे. याचबरोबर 9 जुलै रोजी 33 मंडळात, 10 जुलै रोजी 14 मंडळात, 13 जुलै रोजी 79 मंडळात, 14 जुलै रोजी 36 मंडळात मोठ्या प्रमाणात अतिवृष्टी झाली. नांदेड जिल्ह्यातील सर्व परिस्थितीचा सारासार विचार करता या पूर परिस्थितीमुळे सुमारे 5 लाख 33 हजार 384 शेतकऱ्यांच्या 2 लाख 97 हजार 432.17 हेक्टर क्षेत्रावरील पिकांचे नुकसान झाले. यात 1 हजार 429 हेक्टर क्षेत्रातील जमिनी खरडून नुकसान झाले आहे. सदर शेती पिक व शेतजमीन नुकसानीचा तालुका निहाय तपशील जिल्हा प्रशासनाने दिला आहे.

नांदेड तालुक्यात 15 हजार 700 शेतकरी बाधित असून 9 हजार 630 हेक्टर जिरायत बाधित क्षेत्र, 91 हेक्टर बागायत बाधित क्षेत्र, 3.17 हेक्टर फळपीक बाधित क्षेत्र असून 9 हजार 724.17 हेक्टर हे एकुण बाधित क्षेत्र आहे तर 110 हेक्टर क्षेत्र शेतजमीन खरडून नुकसान झाले आहे.

अर्धापूर तालुक्यात 21 हजार 500 शेतकरी बाधित असून 10 हजार 81 हेक्टर जिरायत बाधित क्षेत्र, 1 हजार 70 हेक्टर बागायत बाधित क्षेत्र असून 11 हजार 151 हेक्टर हे एकुण बाधित क्षेत्र आहे तर 70 हेक्टर क्षेत्र शेतजमीन खरडून नुकसान झाले आहे.

कंधार तालुक्यात 44 हजार 965 शेतकरी बाधित असून 24 हजार 100 हेक्टर जिरायत बाधित क्षेत्र, 15 हेक्टर बागायत बाधित क्षेत्र असून 24 हजार 115 हेक्टर हे एकुण बाधित क्षेत्र आहे.

लोहा तालुक्यात 41 हजार 200 शेतकरी बाधित असून 22 हजार 800 हेक्टर जिरायत बाधित क्षेत्र असून 22 हजार 800 हेक्टर हे एकुण बाधित क्षेत्र आहे.

देगलूर तालुक्यात 32 हजार 400 शेतकरी बाधित असून 18 हजार 474 हेक्टर जिरायत बाधित क्षेत्र असून 18 हजार 474 हेक्टर हे एकुण बाधित क्षेत्र आहे.

मुखेड तालुक्यात 21 हजार 300 शेतकरी बाधित असून 8 हजार 520 हेक्टर जिरायत बाधित क्षेत्र असून 8 हजार 520 हेक्टर हे एकुण बाधित क्षेत्र आहे.

बिलोली तालुक्यात 32 हजार 114 शेतकरी बाधित असून 15 हजार 557 हेक्टर जिरायत बाधित क्षेत्र असून 15 हजार 557 हेक्टर हे एकुण बाधित क्षेत्र आहे.

नायगाव तालुक्यात 46 हजार 788 शेतकरी बाधित असून 14 हजार 15 हेक्टर जिरायत बाधित क्षेत्र, बागायत बाधित क्षेत्र 110 हेक्टर असून 14 हजार 125 हेक्टर हे एकुण बाधित क्षेत्र आहे.

धर्माबाद तालुक्यात 20 हजार 748 शेतकरी बाधित, 12 हजार हेक्टर जिरायत बाधित क्षेत्र असून 12 हजार हेक्टर हे एकुण बाधित क्षेत्र असून शेत खरडून 160 हेक्टर आहे.

उमरी तालुक्यात 21 हजार 260 शेतकरी बाधित असून 9 हजार 540 हेक्टर जिरायत बाधित क्षेत्र, बागायत क्षेत्र 1 हजार 530 हेक्टर असून 11 हजार 70 हेक्टर हे एकुण बाधित क्षेत्र आहे.

भोकर तालुक्यात 40 हजार 950 शेतकरी बाधित, 25 हजार 180 हेक्टर जिरायत बाधित क्षेत्र असून 25 हजार 180 हेक्टर हे एकुण बाधित क्षेत्र आहे.

मुदखेड तालुक्यात 30 हजार 107 शेतकरी बाधित असून 6 हजार 973 हेक्टर जिरायत बाधित क्षेत्र, 6 हजार 973 हेक्टर हे एकुण बाधित क्षेत्र आहे.

हदगाव तालुक्यात 52 हजार 431 शेतकरी बाधित असून 16 हजार 415 हेक्टर जिरायत बाधित क्षेत्र, फळबाग 28 हेक्टर क्षेत्र असून 26 हजार 443 हेक्टर हे एकुण बाधित क्षेत्र आहे. तर शेतजमीन खरडून नुकसान झालेले क्षेत्र हे 63 हेक्टर आहे.

हिमायतनगर तालुक्यात 33 हजार 215 शेतकरी बाधित असून 26 हजार 402 हेक्टर जिरायत बाधित क्षेत्र असून 26 हजार 402 हेक्टर हे एकुण बाधित क्षेत्र आहे. तर शेतजमीन खरडून नुकसान झालेले क्षेत्र हे 166 हेक्टर आहे.

किनवट तालुक्यात 54 हजार 503 शेतकरी बाधित असून 48 हजार 832 हेक्टर जिरायत बाधित क्षेत्र असून 48 हजार 832 हेक्टर हे एकुण बाधित क्षेत्र आहे. तर शेतजमीन खरडून नुकसान झालेले क्षेत्र हे 720 हेक्टर आहे.

माहूर तालुक्यात 24 हजार 203 शेतकरी बाधित असून 16 हजार 63 हेक्टर जिरायत बाधित क्षेत्र, फळपीक बाधित क्षेत्र 3 हेक्टर असून 16 हजार 66 हेक्टर हे एकुण बाधित क्षेत्र आहे. तर शेतजमीन खरडून नुकसान झालेले क्षेत्र हे 140 हेक्टर आहे.

जिल्ह्यातील एकुण बाधित शेतकऱ्यांची संख्या ही 5 लाख 33 हजार 384 एवढी आहे. जिरायत बाधित क्षेत्र 2 लाख 94 हजार 582 हेक्टर एवढे आहे. बागायत बाधित क्षेत्र 2 हजार 816 हेक्टर आहे. फळपीक बाधित क्षेत्र 34.17 हेक्टर आहे. एकुण बाधित क्षेत्र हे 2 लाख 97 हजार 432.17 हेक्टर एवढे आहे. शेतजमीन खरडून नुकसान झालेले क्षेत्र हे 1 हजार 429 हेक्टर एवढे आहे.

जिल्हाधिकारी डॉ. विपीन इटनकर यांनी खरीप हंगाम आढावा बैठकीत अतिवृष्टीची संभावणा लक्षात घेऊन मंडळ निहाय महसूल यंत्रणांना दक्षतेचे आदेश दिलेले होते. जिल्ह्यातील सर्व उपविभागीय अधिकारी, तहसिलदार, नायब तहसिलदार व कृषि विभागाचे अधिकारी हे प्रत्येक मंडळ निहाय प्रत्‍यक्ष भेट देऊन पाहणी करीत आहेत. सदर पिक नुकसानीचे संयुक्त पंचनामे करण्यासाठी महसूल विभागातील 439 तलाठी, कृषि विभागातील 643 कृषि सहाय्यक व जिल्हा परिषद विभागातील 884 ग्रामसेवक ही टीम प्रत्यक्ष बांधावर जाऊन युद्धपातळीवर काम करीत आहेत. आज रोजी 1 लाख 47 हजार 67 एवढ्या शेतकऱ्यांचे 81 हजार 943 हेक्टर क्षेत्राचे पंचनामे पूर्ण झाले असून उर्वरीत पंचनामे तात्काळ पूर्ण करण्याचे निर्देश जिल्हाधिकारी डॉ. विपीन इटनकर यांनी दिले.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here