Home महाराष्ट्र धान रोवण्याची कामे रोजगार हमी योजनेतून करा : शेतकरी कामगार पक्षाची मुख्यमंत्र्यांकडे...

धान रोवण्याची कामे रोजगार हमी योजनेतून करा : शेतकरी कामगार पक्षाची मुख्यमंत्र्यांकडे मागणी

54
0

आंशुराज पाटिल मालेगाव कार्यालय

IMG-20220718-WA0037.jpg

धान रोवण्याची कामे रोजगार हमी योजनेतून करा : शेतकरी कामगार पक्षाची मुख्यमंत्र्यांकडे मागणी

 

गडचिरोली (१८ जुलै) : पूर आणि अतिवृष्टीग्रस्त गडचिरोली जिल्ह्यातील शेतकऱ्यांच्या धान रोवणी व रोवणी पश्चात कामांना शासनाच्या रोजगार हमी योजनेअंतर्गत करण्यात येवून दिलासा द्यावा अशी मागणी शेतकरी कामगार पक्षाने राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्याकडे केली आहे.

निवेदनात शेतकरी कामगार पक्षाने म्हटले आहे की, जिल्ह्यात पाऊस आणि पुरामुळे थैमान घातले आहे. यामुळे धान उत्पादक शेतकऱ्यांचे पऱ्हे, आवते वाहून गेले. शेतकऱ्यांनी बॅंकांकडून घेतलेल्या पिक कर्जाची रक्कम यामध्ये गुंतविली होती. तसेच नव्याने पऱ्हे, आवते पेरण्याची वेळ निघून गेलेली असल्याने आर्थिक विवंचनेमुळे शेती पडीक राहण्याची परिस्थिती निर्माण झाली असल्याची बाब लक्षात आणून दिली आहे.

जिल्ह्यातील अतिवृष्टी आणि पुर परिस्थिती लक्षात घेता सरकारने सर्व शेतकऱ्यांना कर्जमाफी आणि सानुग्रह मदत करणे क्रमप्राप्त आहे. मात्र सदर मदतीच्या बळावर नुकसान भरुन निघणे शक्य नसून ठोस उपाययोजना करण्याची गरज आहे, असेही निवेदनात म्हटले आहे.

त्यामुळे गडचिरोली जिल्ह्यातील सर्व शेतकऱ्यांची धान रोवणी व रोवणी पश्चात कामे शासनाच्या रोजगार हमी योजनेअंतर्गत करण्यात येवून खते, कीडनाशके – औषधे, औजारे आणि मजूरी यासाठीचा खर्च प्रती एकरी प्रमाणे मजगी आणि फळबाग योजनेच्या धर्तीवर खात्यात जमा करण्यात येवून धान उत्पादन घेण्यासाठी शेतकऱ्यांना दिलासा देण्यात यावा, अशीही मागणी शेतकरी कामगार पक्षाचे नेते भाई रामदास जराते, जिल्हा खजिनदार भाई शामसुंदर उराडे, जयश्रीताई वेळदा यांनी केली आहे.

Previous articleपूरग्रस्तांच्या मदतीला धावल्या सामाजिक संस्था, संघटना.
Next articleवियानी विद्या निकेतन गडचिरोलीचे सुयश
युवा मराठा न्यूजपेपर्स आणि वेब पोर्टलवर प्रसिद्ध झालेल्या बातम्या व लेखांशी संपादक, मालक प्रकाशक  / अथवा मुद्रक सहमत असतीलच असे नाही. बातमी, लेख व जाहिरातीतील मजकूराची वैधता तपासून पाहू शकत नाही. बातमी, लेख व जाहिरातीतून उद्भवणाऱ्या कोणत्याही विषयाला युवा मराठा न्यूज जबाबदार नसून, संबंधित वार्ताहर, लेखक किंवा जाहिरातदारच आहे. युवा मराठा आँनलाईन वेब न्युज पोर्टल कुठलीही जबाबदारी घेत नाही. शिवाय वादविवाद हे मालेगांव, जि.नाशिक न्यायालयाअंतर्गतच चालविले जातील. भारत सरकारने फेब्रुवारी 2021 पासून अधिसूचित केलेल्या नव्या माहिती तंत्रज्ञान (मध्यस्थ मार्गदर्शक सूचना आणि डिजिटल माध्यमांसाठीची आचार संहिता) नियम 2021 अंतर्गत असलेल्या डिजिटल माध्यमांसाठीच्या आचार संहितेचे आम्ही पालन करतो. तरीही एखाद्या बातमीविषयी आपली तक्रार असल्यास आमच्या वेब माध्यमचे तक्रार निवारण अधिकारी आणि स्वनियमन संस्थेकडे विहित नमुन्यात अर्ज करू शकता. आपल्या तक्रारीचे निराकरण केले जाईल.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here