Home Breaking News अतिवृष्टीमुळे आपादग्रस्तांना त्वरित मदत करा. उपमुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस यांच्याकडे माजी आमदार प्रा....

अतिवृष्टीमुळे आपादग्रस्तांना त्वरित मदत करा. उपमुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस यांच्याकडे माजी आमदार प्रा. अतुल देशकर यांची मागणी.

69
0

आंशुराज पाटिल मालेगाव कार्यालय

IMG-20220720-WA0007.jpg

अतिवृष्टीमुळे आपादग्रस्तांना त्वरित मदत करा.

उपमुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस यांच्याकडे माजी आमदार प्रा. अतुल देशकर यांची मागणी.

जुगनाळा – गांगलवाडी जवळील नाल्यावर उंच पुलाचे बांधकाम करण्यासहित अतिवृष्टीमुळे खराब झालेल्या रस्त्यांची तात्काळ दुरुस्ती करण्याचीही केली मागणी.

ब्रह्मपुरी :

राज्याचे उपमुख्यमंत्री मा.देवेंद्रजी फडणवीस पूर परिस्थितीची पाहणी करण्याकरिता चंद्रपूर जिल्ह्याच्या दौऱ्यावर आले असता, ब्रह्मपुरी विधानसभा क्षेत्राचे माजी आमदार प्रा.अतुल देशकर यांनी देवेंद्रजी फडणवीस यांची भेट घेत ब्रह्मपुरी तालुक्यातील पूर पूरपरिस्थिती व अतिवृष्टीमुळे निर्माण झालेल्या परिस्थितीचा आढावा दिला. यावेळी अतिवृष्टीमुळे आपदग्रस्तांना त्वरित मदत करून त्यांना दिलासा द्यावा अशी मागणी माजी आमदार प्रा.अतुल देशकर यांनी उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडे केली.

पूर व अतिवृष्टीमुळे शेतीचे व पडलेल्या घरांचे त्वरित पंचनामे करण्यात यावे, आपादग्रस्तांना योग्य तो मोबदला सरसकट देण्यात यावा सोबतच शेतकऱ्यांना पीक विम्याची रक्कम त्वरित देण्याची मागणी माजी आमदार देशकर यांनी उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडे केली. तसेच ब्रह्मपुरी तालुक्यातील जुगनाळा व गांगलवाडी गावाजवळील नाल्यावर उंच पुलाचे बांधकाम करणे, व लाडज, रणमोचन, खरकाडा या गावांचे पुनर्वसन करणे व पुरामुळे नुकसान झालेल्या रस्त्यांची लवकरात लवकर दुरुस्ती करण्याचीही मागणी या वेळी अतुल देशकर यांनी उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडे केली.

यावेळी उपमुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस यांनी संपूर्ण बाबींवर सविस्तर चर्चा करत यावर सकारात्मक कार्यवाही करण्याचे आश्वासन माजी आमदार अतुल देशकर यांना दिले. याप्रसंगी भाजपा जिल्हा संघटन महामंत्री संजय गजपुरे, भाजपा नगर महामंत्री मनोज भूपाल, कोषाध्यक्ष अरविंद नंदुरकर साकेत भानारकर, युवा मोर्चा जिल्हा सचिव तनय देशकर व नितीन बोदेले उपस्थित होते.

Previous article21 ला काँग्रेसचे सक्तवसुली संचनालय (ED) कार्यालय नागपूर येथे आंदोलन
Next articleजिल्ह्यात ओला दुष्काळ जाहीर करा
युवा मराठा न्यूजपेपर्स आणि वेब पोर्टलवर प्रसिद्ध झालेल्या बातम्या व लेखांशी संपादक, मालक प्रकाशक  / अथवा मुद्रक सहमत असतीलच असे नाही. बातमी, लेख व जाहिरातीतील मजकूराची वैधता तपासून पाहू शकत नाही. बातमी, लेख व जाहिरातीतून उद्भवणाऱ्या कोणत्याही विषयाला युवा मराठा न्यूज जबाबदार नसून, संबंधित वार्ताहर, लेखक किंवा जाहिरातदारच आहे. युवा मराठा आँनलाईन वेब न्युज पोर्टल कुठलीही जबाबदारी घेत नाही. शिवाय वादविवाद हे मालेगांव, जि.नाशिक न्यायालयाअंतर्गतच चालविले जातील. भारत सरकारने फेब्रुवारी 2021 पासून अधिसूचित केलेल्या नव्या माहिती तंत्रज्ञान (मध्यस्थ मार्गदर्शक सूचना आणि डिजिटल माध्यमांसाठीची आचार संहिता) नियम 2021 अंतर्गत असलेल्या डिजिटल माध्यमांसाठीच्या आचार संहितेचे आम्ही पालन करतो. तरीही एखाद्या बातमीविषयी आपली तक्रार असल्यास आमच्या वेब माध्यमचे तक्रार निवारण अधिकारी आणि स्वनियमन संस्थेकडे विहित नमुन्यात अर्ज करू शकता. आपल्या तक्रारीचे निराकरण केले जाईल.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here