आशाताई बच्छाव
अतिवृष्टीमुळे झालेल्या नुकसानीची भरपाई द्या.. शिव शंकर पाटील कलंबरकर
नियमित कर्ज भरणाऱ्या शेतकऱ्यांना विनाअट प्रोत्साहनपर 50 हजार रु. द्या.
संग्राम पाटील तांदळीकर
मुखेड तालुका प्रतिनिधी
प्रतिनिधी- अगोदरच बोगस बियाणे आणि दुबार पेरणीच्या संकटातून शेतकरी बाहेर येत असतांना,गेल्या दहा दिवसांपासून अतिवृष्टी आणि महापुराने कहर केला आहे.कोवळ्या पिकांचे होत्याचे नव्हते करून टाकले आहे.या परिस्थितीत शेतकऱ्यांना सरकारच्या आधाराची गरज आहे.तात्काळ या अतिवृष्टी-महापूर परिस्थितीतुन झालेल्या नुकसानीची जलद शासकीय प्रक्रिया पूर्ण करून शेतकऱ्यांना नुकसानभरपाई द्या,अशी मागणी मुख्यमंत्र्यांकडे तहसीलदार यांच्या मार्फत स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे शिवशंकर पाटील कलंबरकर यांनी केली आहे.
जो शेतकरी नियमित कर्ज भरतो त्या शेतकऱ्यांना सरकार कडून आजप्रयन्त कोणतीही मदत मिळाली नाही.त्या शेतकऱ्यांना प्रोत्साहनपर 50 हजार रुपय रक्कम देण्याचा विचार गेल्या दोन तीन वर्षापासून अपूर्ण आहे.त्यात ही प्रोत्साहनपर 50 हजार रुपय रक्कम देतांना गेल्या सरकारकडून खूप जाचक अटी लादण्यात आल्या होत्या.या सर्व अटी रद्द करून,नियमित कर्ज भरणाऱ्या शेतकऱ्यांना विनाअट 50 हजार रुपय प्रोत्साहनपर रक्कम द्या,असे आवाहन निवेदनात करण्यात आले आहे.