आशाताई बच्छाव
हवालदिल शेतक-यांना हेक्टरी ५० हजाराची मदत द्या.
▪️राजु पाटील यांचे मुख्यमंञ्याकडे साकडे.
नांदेड जिल्हा ब्युरो चीफ मनोज बिरादार (युवा मराठा न्यूज नेटवर्क)
राज्यात गेल्या चार ते पाच दिवसा पासुन चालु असलेल्या अतिवृष्टिचा खरीप पिकाना मोठा तडाखा बसला आसुन हवालदिल शेतक-यांना हेक्टरी ५० हजार रुपयाची अर्थिक मदत करावी व बिलोली तालुका ओला दुष्काळ जाहीर करावा आशी मागणी समाजसेवक तथा भ्रष्टाचार समितीचे प्रदेश सरचिटणीस राजु पाटील शिंपाळकर यानी राज्याचे मुख्यमंञी एकनाथरावजी शिंदे यांच्याकडे निवेदनाद्वारे केली आहे.
निसर्गाच्या लहरी पणामुळे राज्यात गेल्या चार ते पाच दिवसा पासुन चालु आसलेल्या अतिवृष्टिचा मोठा तडाखा बिलोली तालुक्याला बसला आसुन सोयाबिन ,मुग,उडीद,कापुस यासह अन्य खरीप पिकांचे भाजीपाला व फळबागाचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आसुन तसेच कौलारु घरादाराची मोठ्या प्रमाणात पडझड झाल्याने अनेकांचे संसार उघड्यावर पडलेले आहेत. आशा बेघर कुंटुबाना अर्थिक मदत करावी तसेच विशेष बाब आशी की तालुक्याच्या उत्तरे कडुन गोदावरी नदी पुर्वेकडुन मांजरा नदी तर दक्षिणेकडुन मन्याड नदिचे आरपार वाहाते पाञ आसुन या नद्याना मोठ्या प्रमाणात महापुर आल्याने नदी काठा लगत आसलेल्या हजारो हेक्टर जमिनीवरील पिके मातीसह खरडुन गेलेली आहेत. तरी मुख्यमंञी साहेबांनी बिलोली तालुक्यातील अतिवृष्टी नुकसानीची विशेष बाब लक्षात घेऊन या हवालदिल शेतक-यांना विशेष अर्थिक मदत करावी व तालुका ओला दुष्काळ म्हणुन जाहीर करावा तसेच तालुक्यातील सरसकट पिक नुकसानीचे पंचनामे करुन नुकसानग्रस्त शेतक-यांना हेक्टरी ५० हजार रुपयाची अर्थिक मदत करावी आशी मागणी समाजसेवक तथा अखिल भारतिय भ्रष्टाचार निर्मुलन समितीचे प्रदेश सरचिटणीस राजु पाटील शिंपाळकर यानी राज्याचे मुख्यमंञी एकनाथरावजी शिंदे यांच्याकडे ता.१३ जुलै रोजी निवेदनाद्वारे केली आहे.