आशाताई बच्छाव
अतिवृष्टीमुळे शहरामध्ये घरात पाणी शिरल्याने खा.अशोक नेतेंनी केली पाहणी
गडचिरोली,(सुरज गुंडमवार ब्युरो चीफ युवा मराठा न्युज नेटवर्क)
गडचिरोली जिल्ह्यात व शहरामध्ये दोन-तीन दिवस सततच्या पावसाने व अतिवृष्टीने घरात पाणी शिरल्याने नागरिकांची जनजीवन विस्कळीत झाले.या अतिवृष्टीमुळे व सततच्या पावसाने घराचे व शेतीचे सुद्धा फार मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे.
गडचिरोली शहरामध्ये रेड्डी गोडाऊन, राधे बिल्डिंग,कॅम्पएरिया, रामनगर, या ठिकाणची पाहणी केल्यानंतर पाण्याचा प्रवाह पाणलोटमुळे नालीचा पाणी चोकप झाल्याने व नालीच्या बांधकामाची उंची कमी असल्याने तसेच रोडची उंची सुद्धा खाली असल्याने नागरिकांच्या घरात पाणी शिरले ही बाब निदर्शनास आली.
गडचिरोली शहरामध्ये दोन-तीन दिवस सततच्या पावसाने व अतिवृष्टीने घरात पाणी शिरल्याने नागरिकांचे जनजीवन विस्कळीत होऊन फार मोठ्या प्रमाणात नुकसान सुध्दा झालेला आहे.
यावर उपाययोजना करावे कींवा काय उपाययोजना केल्या जातील.असे निर्देश मुख्याधिकारी व बांधकाम अभियंता यांना खा.अशोकजी नेते यांनी दिले.
याप्रसंगी खा.अशोकजी नेते, अनिल पोहनकर,निखिल चरडे,प्रकाश निकुरे,बंटी खडसे, नंदु कुंभारे, हर्षल गेडाम,विशाल वाघ मुख्याधिकारी,अंकुश भालेराव बांधकाम अभियंता विजय कुमरे, तसेच अनेक कार्यकर्ते उपस्थित होते