आशाताई बच्छाव
आधी गुरुसी वंदावे,मग साधन साधावे,गुरु म्हणजे माय बापं नाम घेता हरतील पापं
गुरू त्यांच्याजवळील ज्ञान आणि अनुभवातून शिष्याला मार्गदर्शन करत असतात. जीवन जगत असतांना या ज्ञान आणि अनुभवाची प्रत्येकाला गरज असते. स्वानुभवातुन शिकण्यापेक्षा एखादया व्यक्तीचा सल्ला घेतल्यामुळे जीवनातील समस्या लवकर सोडविता येतात आणि जीवन सुखी-समाधानी होते. थोडक्यात जीवनात गुरूशिवाय तरणोपाय नाही. म्हणूनच जन्म देणारी आई असो अथवा अध्यात्मिक मार्गदर्शन करणारे सद्गुरू असोत खरा गुरू मिळणं ही भाग्याची गोष्ट आहे. ज्याच्या जीवनात खरा गुरू अथवा सद्गुरू आहे त्याचे जीवन यशस्वी झाल्याशिवाय राहणार नाही. मात्र शिष्याला गुरूं प्रती कृतज्ञता आणि श्रध्दा असणे गरजेचे आहे. यासाठीच गुरूपौर्णिमेचे महत्त्व प्रत्येकाला माहीत असणे आवश्यक आहे.जे जे आपणास ठावे, ते दुसऱ्यासी देई, शहाणे करुन सोडी, सकळं जना,तोची गुरु खरा, आधी चरण तयाचे धरा,गुरुपौर्णिमेच्या हार्दिक शुभेच्छा