आशाताई बच्छाव
पालक सचिवांनी घेतली VC द्वारे आढावा बैठक. तहसिल कार्यालयातील आढावा बैठकीला तहसीलदारासह तीनही ठाणे प्रमुखाची उपस्थिती.
नायगाव तालुका प्रतिनिधी निळकंठ मोरे पाटील ( युवा मराठा न्युज)
गेल्या वर्षी झालेल्या अतिवृष्टीमुळे अतोनात नुकसान झाले मात्र यावर्षी प्रशासन खडबडून जागे झाले त्यासाठीची खबरदारी म्हणून संबंधित विभागाच्या अधिकाऱ्याने तात्काळ बैठकीचे आयोजन केले.हवामान विभागाने पुढील पाच दिवस पावसाचा इशारा दिल्याने प्रशासनाने पूर्व नियोजनासाठी आढावा बैठक घेतली. पालक सचिव एकनाथ डवले यांनी VC द्वारे नांदेड जिल्ह्यातील नायगाव तालुक्याचा आढवा घेतला. पालक सचिव यांच्या अध्यक्षतेखाली आपत्ती व्यवस्थापनाची आढावा बैठक नायगाव तहसील कार्यालय येथे शुक्रवारी दहा वाजता ही बैठक पार पडली.
जुन ते ऑक्टोबर या कालावधीत होणाऱ्या अतिवृष्टी, पूर,वादळ अशा नैसर्गीक आपत्तीमुळे होणा-या संभावीत जिवीत,वित्तहानी व त्या संबंधाने करावयाचे उपाययोजना तसेच आपत्ती व्यवस्थापन याबाबत आढावा मा. एकनाथ डवले, प्रधान सचिव, कृषी विभाग, महाराष्ट्र शासन तथा पालक सचिव नांदेड जिल्हा यांचे अध्यक्षतेखाली दि.8 जुलै रोजी सकाळी 10 वा. VC द्वारे बैठक आयोजित करण्यात आली होती.
या बैठकीत उपविभागीय अधिकारी श्री सचिन गिरी, तहसीलदार गजानन शिंदे, कुंटूर पोलिस स्टेशनचे पोलिस निरीक्षक महादेव पुरी, नायगावचे सहायक निरीक्षक एस.एस. बाचावार, रामतीर्थ पोलिस निरीक्षक व्हीं.आर. पल्लेवाड, नायगाव नगर पंचायतचे संतराम जाधव आदी उपस्थित होते. तर तहसील कार्यालयाचे कर्मचारी युनूस शेख, साईनाथ भंडारे कर्मचाऱ्यांनी व्हिडिओ कॉन्फरन्ससाठी मेहनत घेतली.