आशाताई बच्छाव
पंतप्रधान मोदींचा एक फोन, नाराज फडणवीसांनी उपमुख्यमंत्री पदाची शपथ घेतली..?
मुंबई (अंकुश पवार, जिल्हा प्रतिनिधी, युवा मराठा वेब न्यूज चॅनल अँड पेपर)
एकनाथ शिंदे राज्याचे नवे मुख्यमंत्री झाले आहेत. त्यांच्या नावाची घोषणा देवेंद्र फडणवीस यांनी केल. “आज शिवसेनेचा विधीमंडळ गट शिंदे यांच्या नेृत्वाखाली आम्ही भाजप आणि १६ अपक्ष -छोटे आमदार हा सोबत आलेला आहे. आणखी काही सोबत येत आहे. भाजपाने हा निर्णय़ केली आहे, आम्ही सत्तेच्या मागे नाहीत, ही तत्वांची लढाई आहे, ही विचारांची लाढाई आहे. भाजपा शिंदे यांना समर्थन देईल आणि एकनाथ शिंदे हे मुख्यमंत्री होतील,” अशी माहिती फडणवीस यांनी याआधी दिली.
शिवसेनेचे नेते एकनाथ शिंदे यांच्यासोबत भाजपाचे नेते देवेंद्र फडणवीस हे उपमुख्यमंत्रीपदाची शपथ घेणार आहेत. याआधी आज फक्त एकनाथ शिंदे हेच मुख्यमंत्रीपदाची शपथ घेतील असं सांगण्यात आलं होतं. तसेच मी या सरकारमध्ये प्रत्यक्ष सहभागी नसेन, असे फडणवीस यांनी सांगितले होते. मात्र भाजपाचे केंद्रीय नेते अमित शाह आणि जेपी नड्डा यांनी फडणवीस यांनी उपमुख्यमंत्री होऊन राज्यात सहभागी व्हावे अशी विनंती केली. या विनंतीनंतर फडणवीसांनी उपमुख्यमंत्रीपद स्वीकारण्यासा होकार दिला आहे. आज एकनाथ शिंदे यांच्यासोबतच फडणवीस यांचादेखील शपथविधी होईल.
राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी भाजपाचे नेते व माजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी नव्या सरकारमध्ये उपमुख्यमंत्री म्हणून शपथ घेण्याबाबत आश्चर्य व्यक्त केलं आहे. तसेच हा आश्चर्याचा धक्का असल्याचं म्हटलंय. “भाजपात दिल्ली किंवा नागपूरचा आदेश आला की तडजोड नसते. त्यामुळे फडणवीसांना त्या आदेशाचं पालन करावं लागलं आणि एकनाथ शिंदे यांच्याकडे मुख्यमंत्रीपदाची जबाबदारी गेली,” असं मत एकनाथ शिंदे यांनी व्यक्त केलं.
शरद पवार म्हणाले, “राज्याचे ३८-३९ आमदार आसाममध्ये गेले होते. तेव्हा त्यांचं नेतृत्व करणाऱ्या एकनाथ शिंदे यांची अपेक्षा उपमुख्यमंत्रीपदापेक्षा अधिक असेल असं वाटत नाही. मात्र, भाजपात दिल्लीचा आदेश असो, की नागपूरचा आदेश असो, तो आदेश आला की त्यात तडजोड नसते. हा आदेश आला आणि त्याचा परिणाम राज्याच्या मुख्यमंत्रीपदाची जबाबदारी एकनाथ शिंदे यांच्याकडे देण्यात आली. त्याची कल्पना कुणालाही नव्हती. कदाचित एकनाथ शिंदे यांनाही नसावी.”
“हा आश्चर्याचा धक्का होता. पण एकदा आदेश झाला आणि सत्तेची कोणतीही संधी मिळाली की ती स्विकारायची असते. याचं उदाहरण देवेंद्र फडणवीस यांनी घालून दिलं आहे,” असंही शरद पवार यांनी नमूद केलं