आशाताई बच्छाव
हरणबारी घाटात संरक्षक भिंत नसल्याने प्रवास धोक्याचा.
युवा मराठा न्यूज नेटवर्क
संदीप गांगुर्डे पिंगळवाडे
महाराष्ट्र व गुजरात या दोन राज्यांना जोडणारा व मूल्हेर परिसरातील आदिवासी बांधवांचा मुख्य रस्ता म्हणून संबोधला जाणारा ताहराबाद ते आहवा या रस्त्या दरम्यान हरणबारी धरणाचा जवळ हरणबारी घाट आहे. साधारण हा घाट एक किलोमीटरचा आहे. या घाटात काही ठिकाणी मोडकळीस आलेले संरक्षण भिंत आहे. परंतु हरणबारी गावाकडे येत असताना कुठल्याही प्रकारचे संरक्षण बॅरिकेट्स किंवा संरक्षण भिंत आढळून येत नाही. या घाटात तीव्र उतार असल्यामुळे मोठ्या वाहनधारकांना आपला प्रवास जिक्रीचा ठरत आहे. या रस्त्याचा मुख्यत वापर साल्हेर किल्ल्यावर जाणाऱ्या पर्यटकांना कडून केला जातो. स्थानिक नागरिकांच्या म्हणण्यानुसार संबंधित विभागाने ठिक ठिकाणी लोखंडी बॅरिकेट्स किंवा पूर्णपणे संरक्षण भिंत दिली तर भविष्यात कुठली अघटित घटना होणार नाही. काही ठिकाणी लोखंडी बॅरिकेटस आहेत. परंतु ते पूर्णपणे मोडकळीस आले आहेत.तसेच रस्त्यावर खड्यांचे प्रमाण दिवसेंदिवस वाढत आहेत. याबाबत संबंधित सार्वजनिक बांधकाम विभाग यांनी लक्ष देण्याची फार गरजेचे आहे……