आशाताई बच्छाव
काळाने केला घात, विज पडुन दोघांचा मृत्यु तर 2 जखमी संग्रामपूर,(रविंद्र शिरस्कार शहरप्रतिनिधी युवा मराठा न्युज नेटवर्क)
दिनांक २३ जून रोजी दुपारच्या वेळी विजांच्या
गडगडाटासह संग्रामपूर तालुक्यासह पळशी झाशी शिवारात जोरदार पावसाला सुरवात झाली. पळशी झाशी शिवारातील शुभम हेलगे यांच्या शेतात क्रेनद्वारा विहिरीचे खोदकाम सुरु होते शेतात ऐकून 4 जण काम करत होते तेवढ्यातच अचानकपणे कडकडाट वीजांचा आवाज सह पाऊस पडायला सुरुवात झाली अचानक पणे शेतातील विहिरीवर क्रेनद्वारा खोदकाम करत असलेले संजय उत्तम मारोडे वय ५५ वर्ष तर रवी संजय भालतडक वय ३५ वर्ष यांचे का अंगावर विज पडून त्यांचा जागीच मृत्यू झाला असून तीथेच काम करणारे मंगेश मनोहर बाखरे व बंडू मधूकर मारोडे यांनी आपले कपडे पावसाने भिजतील या कारणाने ते थोडे अंतरावर एका आडोशाला गेले त्यामुळे ते सुद्धा जखमी झाले आहेत. नशीब बलवत्तर म्हणून ते यामधून बचावले.प्राथमिक उपचारासाठी सर्वप्रथम जखमी झालेल्या दोघांनाही गावातील लोकांनी संग्रामपूर येथे आणि उपचारासाठी दाखल केले असुन मृतक रवि भलतिडक आणि संजय मारोडे यांना पंचनामा आणि शव प्रक्रियेकरिता वरवट ग्रामीण रुग्णालयात नेण्यात आले
प्राथमिक तपास कैलास मेश्रे म.न.पा 1709 केला असून
पुढील तपास रामकीसन माळी साहेब म.न.पा.1558
हे करीत आहे
पुढील उपचारासाठी जखमींना रूग्णवाहिकेव्दारे शेगावला रवाना करण्यात आले. मृतक संजय उत्तम मारोडे हे अल्पभूधारक असून त्यांच्या मागे पत्नी, मुलगा, २ मुली असुन रवि संजय भालतडक यांच्यामागे १ मुलगा, १ मुलगी, पत्नी असा आप्त परिवार आहे.तरुण तडफदार गावातील या तरुणांच्या जाण्याने गावात सर्वत्र हळहळ व्यक्त होत आहे