Home गडचिरोली रिपब्लिकन पक्षाच्या नेत्यांची पाणीपुरवठ्याच्या प्रश्नावर नगरपरिषदेच्या मुख्याधिकाऱ्यांशी चर्चा।

रिपब्लिकन पक्षाच्या नेत्यांची पाणीपुरवठ्याच्या प्रश्नावर नगरपरिषदेच्या मुख्याधिकाऱ्यांशी चर्चा।

54
0

आशाताई बच्छाव

IMG-20220617-WA0016.jpg

रिपब्लिकन पक्षाच्या नेत्यांची पाणीपुरवठ्याच्या प्रश्नावर नगरपरिषदेच्या मुख्याधिकाऱ्यांशी चर्चा।

गडचिरोली,(सुरज गुंडमवार ब्युरो चीफ युवा मराठा न्युज नेटवर्क)– शहरातील सर्व पाण्याच्या टाक्यांभोवती कंपाऊंड भिंती बांधण्यात याव्यात आणि कोणताही अनुचित प्रकार घडू नये यासाठी टाकीच्या ठिकाणी पहारेकरी तैनात करून कडक सुरक्षा व्यवस्था करावी अशी मागणी अखिल भारतीय रिपब्लिकन पक्षाच्या वतीने केली आहे.
पक्षाचे केंद्रीय उपाध्यक्ष रोहिदास राऊत यांच्या नेतृत्वाखाली कार्यकर्त्यांच्या शिष्टमंडळाने मंगळवारी नगर परिषदेचे मुख्याधिकारी विशाल वाघ यांची त्यांच्या कार्यालयात भेट घेऊन त्यांच्याशी पाणीपुरवठ्याच्या प्रश्नावर सविस्तर चर्चा करून त्यांना निवेदन दिले.
पिण्याचे पाणी हा अत्यंत महत्त्वाचा व गंभीर प्रश्न असून मनपा प्रशासनाने तो अत्यंत संवेदनशीलपणे हाताळावा, असे श्री.वाघ यांच्याशी झालेल्या चर्चेत सांगितले. शहरातील पाण्याच्या टाक्यांच्या सुरक्षेबाबत प्रशासनाकडून करण्यात येत असलेल्या बंदोबस्ताचीही मागणी केली. मुख्याधिकाऱ्यांनी सर्व आवश्यक माहिती शिष्टमंडळातील सदस्यांना दिली.
पिण्याच्या पाणी पुरवठ्याच्या सर्व पाण्याच्या टाक्या व पाईप लाईन पूर्णपणे स्वच्छ करून मगच रहिवाशांना पिण्याचे पाणी पुरवठा करावा, अशी सूचना निवेदनात करण्यात आली आहे. पिण्याच्या पाण्यात मानवी शरीर आणि मानवी मांसाचे तुकडे सापडल्याच्या घटनेनंतर रहिवाशांमध्ये असुरक्षिततेची भावना निर्माण झाली आहे, याकडे त्यांनी लक्ष वेधले.
शिष्टमंडळात प्रदेश महिला उपाध्यक्षा सुरेखाताई बारसागडे, प्रदेश उपाध्यक्ष प्रा.प्रकाश दुधे, ज्येष्ठ आदिवासी नेत्या कुसुम आलाम, जिल्हा सरचिटणीस हंसराज उंदिरवाडे, शहराध्यक्ष अनिल बारसागडे, सामाजिक कार्यकर्ते विलास निंभोरकर, जिल्हा युवा सचिव पुण्यवन आदी उपस्थित होते.

Previous articleगुरवळा रोडवर अज्ञात वाहनाच्या धडकेत दुचाकीस्वार ठार , एक जखमी
Next articleस्व.बाबुराव जी मडावी साहेब यांचे सामाजिक कार्य अमुल्य आहेत खा.अशोक नेत.राष्ट्रीय महामंत्री
युवा मराठा न्यूजपेपर्स आणि वेब पोर्टलवर प्रसिद्ध झालेल्या बातम्या व लेखांशी संपादक, मालक प्रकाशक  / अथवा मुद्रक सहमत असतीलच असे नाही. बातमी, लेख व जाहिरातीतील मजकूराची वैधता तपासून पाहू शकत नाही. बातमी, लेख व जाहिरातीतून उद्भवणाऱ्या कोणत्याही विषयाला युवा मराठा न्यूज जबाबदार नसून, संबंधित वार्ताहर, लेखक किंवा जाहिरातदारच आहे. युवा मराठा आँनलाईन वेब न्युज पोर्टल कुठलीही जबाबदारी घेत नाही. शिवाय वादविवाद हे मालेगांव, जि.नाशिक न्यायालयाअंतर्गतच चालविले जातील. भारत सरकारने फेब्रुवारी 2021 पासून अधिसूचित केलेल्या नव्या माहिती तंत्रज्ञान (मध्यस्थ मार्गदर्शक सूचना आणि डिजिटल माध्यमांसाठीची आचार संहिता) नियम 2021 अंतर्गत असलेल्या डिजिटल माध्यमांसाठीच्या आचार संहितेचे आम्ही पालन करतो. तरीही एखाद्या बातमीविषयी आपली तक्रार असल्यास आमच्या वेब माध्यमचे तक्रार निवारण अधिकारी आणि स्वनियमन संस्थेकडे विहित नमुन्यात अर्ज करू शकता. आपल्या तक्रारीचे निराकरण केले जाईल.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here