राजेंद्र पाटील राऊत
लोंबकळत जाणाऱ्या विद्युत तारा तात्काळ बदलवण्यात याव्यात ग्रामस्थांची मागणी
नांदेड जिल्हा ब्युरो चीफ मनोज बिरादार (युवा मराठा न्यूज नेटवर्क )
मुखेड :-तालुक्यातील उंद्री (प.दे.) येथील रस्त्यावरील रहदारी बघता लोंबकळत जाणाऱ्या विद्युत तारा तात्काळ बदलवुन नविन पोल तसेच तारा पावसाळ्यापूर्वी बदलण्याची ग्रामस्थांची मागणी होत असुन तारांमुळे मोठे संकट टळले आहेत,कुठलीही अजुन जिवित हानी झालेली नाही,त्याठिकाणीं नेहमी वर्दळीचे स्वरूप दिसुन येते,लहान मुले खेळतात तारा अचानक तुटल्यास याला जबाबदार कोण असा प्रश्न ग्रामस्थांन समोर उभा राहतो,अन्यथा अपघातांस आमंत्रण देण्यासारखी परीस्थिती उदभवु शकते, पावसाळ्याचे दिवस असल्याने वादळी वाऱ्याने तारे एकमेकांना घर्षण होऊन ठिणगी पडत आहे. चालु विज प्रवाहामुळे रस्त्यावरील वाहने पेटण्याची ही दाट शक्यता असूनvबऱ्याच वेळेस नागरिकांचे या तारांमुळे मोठ्या प्रमाणावर नुकसान झाल्याची देखील त्यात टी,व्ही,लाईट,पंखे,आदी,इलेक्ट्रोनिक वस्तुचे नुकसानीस पात्र नागरीक अगदी चिंताग्रस्त अवस्थेत दिसून आले, पावसाळ्यात नेहमी अजीर्ण तारांमुळे ३/४ दिवस लाईट चा लपंडाव देखील होतो ,तरी वरीष्टानी ही बाब लक्षात घेता पावसापुर्वी लोंबकळत जाणाऱ्या विद्युत तारा व अजीर्ण तारा तात्काळ दुरूस्तीची मागणी ग्रामस्थांच्या वतीने होत आहे.