राजेंद्र पाटील राऊत
पर्यायी रस्त्या अभावी वाहन धारकांचे हाल
शत्रुघ्न काकडे पाटील:- ब्युरो चीफ (युवा मराठा न्युज नेटवर्क)
जिंतूर (परभणी):-तालुक्यातील जिंतूर ते वझर रोडवर सावंगी भांबळे नजीक असलेल्या पुलाचे दुरुस्तीचे काम गेल्या तीन महिन्यांपासून चालू आहे. ऐन पावसाळा तोंडावर आला असतानाही काम चालू असल्यामुळे पर्यायी रस्ता शेत मालकाने बंद केल्यामुळे वाहन धारकानची चांगलीच तारांबळ उडाली आहे.
सदरील काम पुर्नत्वाचे कालावधी हा १ जून च्या आधी असून हे काम १ जून
च्या आधी पूर्ण करण्याचे उद्दिष्ट होते.
परंतु अद्यापही हे काम पूर्ण झाले नाही. त्यामुळे वाहन धारकांचे चांगलेच हाल झाले आहेत. रस्त्यावर वाहनांच्या लांबच लांब रांगा लागल्या होत्या. दरम्यान सदरील काम हे निकृष्ट दर्जाचे होत असल्याची नागरीकांकडून बाब प्रशासनाच्या निदर्शनास आणून देण्यात आली आहे. परंतू प्रशासनाकडून याकडे दुर्लक्ष होत असल्याने नागरीकांकडून संताप व्यक्त करण्यात येत आहे.