आशाताई बच्छाव
वडिलांचे ऐकाल तर कायम खुश राहाल…! संजीवनी अाडणे
वडिलांची जागा कोणालाही घेता येत नाही. म्हणूनच वडिलांचा रागाला सहन करायला शिका, तरच तुम्ही लायक व्हाल. कोण्या बाहेरच्यांचे ऐकून घेण्यापेक्षा वडील जे सांगतील ते शांतपणे ऐका. वडिलांच्या समोर आवाज वाढवून बोलू नका. वडिलांचा आदर करा त्यामुळे तुमची मुले तुमचा आदर करतील, वडिलांचा सन्मान करा यातच तुमचे भले होणार. वडिलांचे म्हणणे ऐका, तुम्ही नक्कीच खुश राहाल वडिलांच्या समोर तुमची नजर झुकवून बोला. वडील म्हणजे एक पुस्तक आहेत ज्यामध्ये अनुभव लिहिले जातात वडिलांच्या सुरु तुमच्यासमोर वाहु देऊ नका. वडील म्हणजे आपल्या जीवनात एक अस व्यक्ती महत्त्व आहे की ते कोणत्याही मापात मोजता येणार नाही. आईची जागा कोणीही घेऊ शकत नाही पण बाप तो बापच असतो. आईच्या पाया खाली स्वर्ग आहे पण बाप त्या स्वर्गाचे दरवाजे असतो. विचार करा हे दरवाजे उघडले नाहीत तर स्वर्गात प्रवेश कसा मिळवाल. बाप मग शिक्षित असो किंवा अडाणी, ज्याला उन्हातानात सुद्धा मुलांच्या जीवनाचे कल्याण करण्याची काळजी असते. तुम्ही स्थिरस्थावर झाल्याशिवाय बापाला चैन पडत नाही. बाप असो वा वडील तो रागीट असो वा व्यसनी पण आपल्या मुलांना प्रेम करण्यात कधीच कमी पडत नाही. रागावलेला बाप शांत झाला की त्याचा जीव मुलाला पाहण्यासाठी कासावीस होतो, ही बाप झाल्याशिवाय कळत नाही. लक्षात ठेवा सूर्य आगीचा गोळा आहे, धगधगता अग्नि आहे पण मावळला की सर्वत्र अंधार आहे. म्हणूनच म्हणतो बाप बाप असतो आई सारखच बापाची जागा सुद्धा कोणालाही घेता येत नाही. मन दडपून मुलांना सुखात ठेवण्यासाठी वरून आनंदित आणी हृदय पिळवटून रडणारा बाप कोणालाही कळणार नाही. ज्यांने बापाचं काळीज दुखावले तो आयुष्यात कधीच हसत नाही.आणि ज्याने बापाला आयुष्यभर आदराने वागवले तो आयुष्याला दोष देत कधी रडणार नाही. आपल्या वडिलांना मान सन्मान देऊन बघा आयुष्यात कधी काहीच कमी पडणार नाही. श्रीमती आशाताई बच्छाव व्यवस्थापकीय संपादक युवा मराठा न्युज नेटवर्क