आशाताई बच्छाव
प्रधानमंत्री गरीब कल्याण लाभार्थी संवाद जिल्हाधिकारी कार्यालय नियोजनभवन गडचिरोली येथे आयोजित……
खा.अशोकजी नेते
केंद्र शासनाच्या संपूर्ण योजना संबंधी माहिती दिली.
खा.अशोकजी नेते
केंद्र सरकारच्या विविध योजनांचा लाभ व त्या कशा अमलांत आणले जाईल यासंबंधी माहिती जिल्हाधिकारी मा.संजय मीना यांनी आपल्या प्रास्ताविकातून केली.
गडचिरोली,(सुरज गुंडमवार ब्युरो चीफ युवा मराठा न्युज नेटवर्क)
केंद्रसरकारच्या आठ वर्षात यशस्वी कार्यकालात लोकहिताचे, जनहिताचे, जनकल्याणाचे, निर्णय घेऊन देशाला प्रगतीपथावर नेण्यासाठी युद्धपातळीवर कामे करीत आहे. सामान्य विविध घटकातील लोकांना न्याय व विविध योजनांचा लाभ मिळायला पाहिजे.असे प्रतिपादन मान.खा.अशोकजी नेते यांनी केले.
भारताच्या 75 व्या स्वातंत्र्यप्राप्तीनंतर अमृत महोत्सवाचे औचित्य साधून देशातील कोणताही नागरिक विकासापासून वंचित राहू नये व त्याचा विविध गरजा सर्वसमावेशक आणि एकत्रितपणे पूर्ण होण्यासाठी शासनाने लाभार्थांवर लक्ष केंद्रित केले आहे.
केंद्र शासनाच्या प्रधानमंत्री विविध योजना संबंधी माहिती देण्यात आली.जसे किसान सम्मान निधि, आयुष्यमान भारत, मुद्रा लोन योजना, आवास योजना, जल जीवन मिशन, स्वच्छ भारत मिशन,उज्वला गॅस योजना, जनधन योजना,गरीब कल्याण अन्न योजना,एक राष्ट्र एक राशन, अशा अनेक प्रधानमंत्री कल्याणकारक योजना आहेत.
तसेच प्रधानमंत्री किसान सन्मान निधीचा( अकरा) 11 हप्ता सुद्धा शेतकऱ्यांच्या खात्यात जमा केला जाईल.
याप्रसंगी मा.खा.अशोकजी नेते.मा.आ.कृष्णाजीगजबे.मा.किसनजी नागदेवते जिल्हाध्यक्ष,मा.मोतीलालभाई
कुकरेजा भाजपा उपाध्यक्ष,मा.संजयजी मीना जिल्हाधिकारी,मा.समाधान शेंडगे उपजिल्हाधिकारी,कुमार आशीर्वाद साहेब,भुयार साहेब,कुतिरकर साहेब,तसेच प्रशासकीय अधिकारी वर्ग अनेक योजनांचे लाभार्थी व नागरिक उपस्थित होते.