राजेंद्र पाटील राऊत
कृषी दुकानदाराकडून शेतकऱ्याची आर्थिक लूट !
नांदेड जिल्हा ब्युरो चीफ मनोज बिरादार (युवा मराठा न्यूज नेटवर्क)
मुखेड – पावसाळा तोंडावर
आल्यामुळे पेरणी पुर्व शेतीच्या मशागातीचे कामे करण्यासाठी शेतकरी सरसावला आहे.पण सोयाबीन बँगाचे भाव तर वाढलेच पण डि.ए.पी.खताची कृत्रिम टंचाई दाखवत असल्याने शेतकऱ्यांना खत मिळत नसल्यामुळे पुरता तरी शेतकरी अडचणीत आला आहे.
गतवर्षी पेक्षा यावर्षी उन्हाळा भयानक असल्यामुळे शेतीचे कामे करण्यासाठी अनेक अडचणी येत आहेत.हवामान खात्याकडून यावर्षी अतिवृष्टी होण्याचा अंदाज वर्तविला असला तरी कांही दिवसावर पावसाळा येऊन ठेपला असल्याने आता शेती कामासाठी शेतकरी सरसावला आहे.यात उन्हाळी पाळी,चिपाड,खसान वेचणीच्या कामात व्यस्त आहेत.पण उन्हामुळे सध्या तरी मजूर मिळत नसल्याने कामाचा तान शेतकरी कुटुंबावर पडत आहे.
खते,बि.बियाणे खरेदी करण्यासाठी कृषी केंद्रावर शेतकऱ्यांची मोठी गर्दी दिसून येत आहे.पण बियाणे व खतांच्या किमंती वाढल्यामुळे शेतकऱ्यांना आर्थिक फटका बसत आहे.केंद्रावर अनेक कंपनीचे सोयाबीन आल्याने नेमके कोणते बियाणे घ्यावेत या संभ्रमात शेतकरी पडला आहे.तर जय किसान डीएपी खतांची कृत्रिम टंचाई दाखवत आमच्याकडे हे खते उपलब्ध नसल्याचे कृषी केंद्र चालक सांगत आहेत.तरी पथकाच्या मदतीने तात्काळ चौकशी करुण डीएपी.खते उपलब्ध करुण देण्याची मागणी शेतकऱ्यातून होत आहे.
सोयाबीनचे बियाणे खरेदी करताना पक्की पावती घेऊन बियाणे खरेदी करावेत जेणे करुण तुमची फसवणूक होणार नाही असे आवाहन शिवसेनेचे यांनी केले आहेत.
मुखेड तालुक्यातील अनेक कृषी दुकानदार शेतकऱ्यांचे आर्थिक लूट करीत असताना संबंधित प्रशासन मात्र डोळे उघडे ठेवून पाहत आहे. शेतकऱ्यांनी मागितलेल्या बियाणे व खते न देता अडवणूक करून व्यापाऱ्याकडून खते बियाण्यांचा साठवणूक करून ऐन पेरणीच्या वेळी बेभाव दराने विक्री करत आहे. अश्या कृषी दुकानदाराचे परवाने तात्काळ रद्द झाले पाहिजे.