राजेंद्र पाटील राऊत
मातंग एकता आंदोलन पिंपरी चिंचवड शहर व ओबीसी सेल च्यावतीने स्व.भारतरत्न मा.पंतप्रधान राजीव गांधी यांचा स्मृती दिन साजरा.
पिंपरी-चिंचवड प्रतिनिधी उमेश पाटील
दापोडी मध्ये भारतरत्न स्वर्गीय राजीव गांधी यांच्या स्मृतिदिनानिमित्त अभिवादन करण्यात आले यावेळी स्वर्गीय भारतरत्न राजीव गांधी यांच्या प्रतिमेस सचिन साठे (महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस सचिव व राधिका ताई अडागळे (अध्यक्ष मातंग एकता अंदोलन पि.चि.शहर महिला आघाडी) युवराज गायकवाड यांच्या हस्ते पुष्पहार घालून त्यांना अभिवादन करण्यात आले. यावेळी बोलताना आज राजीव गांधी असते खरोखरच ते खूप खुश असते कारण की त्यांच्यामुळे आज संगणक आपल्या देशांमध्ये आणून प्रत्येक भारतीयाच्या हातामध्ये आज मोबाईल आला आहे आणि या मोबाइलमुळे प्रत्येक क्षेत्रामध्ये माणूस जाऊ शकतो असे महान भारतरत्न स्वर्गीय राजीव गांधी यांना खरोखरच सर्वांनी भावपूर्ण श्रद्धांजली वाहणे खूप गरज आहे असे मनोगत सचिन साठे व्यक्त केले.यावेळी कुंदन कसबे,नितीन कांबळे, सोमनाथ गायकवाड,राजुभाऊ वाळुंजकर (पिंचिं ब्लॉक कमिटी अध्यक्ष ) भाऊसाहेब पठारे,रामभाऊ औताडे, विशाल कड,योगेश बहिरट आदी उपस्थित होते.कार्यक्रमाचे सुत्रसंचालन रविंद्र बाईत यांनी केले.




