राजेंद्र पाटील राऊत
कौतुकास्पद! नांदा सौख्यभरे! अखेर विधवा भावजयीसोबत लहान दिरानं बांधली लग्नगाठ! बुलढाणा,(स्वप्निल देशमुख ब्युरो चीफ युवा मराठा न्युज)- वानखेड मधील तरुणानं विधवेशी लग्न करत दिला आयुष्यभराचा आधार वहिनीचं वैराग्य दूर केलं, भावाच्या मृत्यूनंतर मुलांसाठी वहिनीशी लग्न
लग्नगाठी या नशिबाने बांधल्या जातात, असे म्हटले जाते. मात्र ही नाती अपघातांनी हिरावली तर काय करायचे? या प्रश्नाचे उत्तर अनेकांकडे नसते.
वानखेड गाव ता. संग्रामपुर येथील श्री रामदास दामधर यांच्या मुलांचा आदर्श विवाह पडला पार
सविस्तर वृत असे की, वानखेड गाव येथील गुरूदेव मंडळांचे सेवेकरी श्री रामदास दामधर तथा यांच्या मोठ्या मुलाचे काही दिवसाअगोदर आजाराने निधन झाले असतांना मोठ्या मुलाच्या निधनाने सुन आणी एक मूलगा लहान व मूलगी मोठी निरागस मुलांच्या भविष्याचा विचार करून सुन नंदा च्या सुखी संसाराला त्यांनी आपल्या दोन नबंरच्या मुलांचे हरीदास सोबत आज शुभमंगल लावुन दिले
*त्यांच्या या निर्णयामुळे सर्वत्र कौतुक होत आहे…*
गुरूदेवाच्या विचारधारेचे असलेले वानखेड गाव येथील दामधर कुटुंबीयांचे आज सर्वच स्तरातुन कौतुक होत आहे एका तरुणानं मात्र समाजापुढे एक वेगळा आदर्श ठेवत एका विधवा महिलेशी विवाह (Marriage with widow woman) केला आहे. त्याने संबंधित महिलेला आयुष्यभराचा आधार दिला आहे.
या अनोख्या लग्नामुळे संबंधित तरुणाचं सर्व स्तरातून कौतुक केलं जात आहे.
महिलेच्या पतीनं अशी अचानक साथ सोडल्यानं संबंधित महिलेवर दु:खाचा डोंगर कोसळला होता.