Home नांदेड लेंडी धरणातील प्रलंबित प्रश्न तात्काळ मार्गी लाउ – डॉ.विपीन इटनकर..

लेंडी धरणातील प्रलंबित प्रश्न तात्काळ मार्गी लाउ – डॉ.विपीन इटनकर..

46
0

राजेंद्र पाटील राऊत

लेंडी धरणातील प्रलंबित प्रश्न तात्काळ मार्गी लाउ – डॉ.विपीन इटनकर..
नांदेड जिल्हा ब्युरो चीफ मनोज बिरादार (युवा मराठा न्यूज नेटवर्क)

लेंडी धरणातील प्रलंबीत प्रश्ने तात्काळ मार्गी लावून धरणाच्या कामाला गती देण्यात येणार असल्याचे प्रतिपादन डॉ.विपीन इटनकर जिल्हाधिकारी नांदेड हे बुधवारी इटग्याळ (पमु.) येथील पुनर्वसनाची पहाणी करण्यासाठी आले असताना केले. उर्वरीत काम तात्काळ करण्याचे सुचना संबंधित विभागाला दिल्या आहेत.
यावेळी सौम्या शर्मा उपविभागीय अधिकारी देगलुर,तहसीलदार काशीनाथ पाटील मुखेड,बिडीओ भालके,संबंधित विभागाचे सर्व पदाधिकारी उपस्थितीत होते.यावेळी धरणग्रस्तांनी अनेक प्रलंबीत प्रश्न मार्गी लावण्याची मागणी जिल्हाधिकारी यांच्याकडे केली यांच्या प्रश्नाना उत्तर देताना म्हणाले की,गावातील वाढीव कुटुंबाची यादी तात्काळ कार्यालयात सादर करावी लवकरच एक बैठक घेऊन धरणग्रस्तातील वाढीव कुटुंबाला स्वेच्छा पुनर्वसनाचा लाभ देऊन जर शेतकरी कुटुंब असेल तर त्यांना ५ लक्ष ५० हजार रुपये तर बिगर शेतकऱ्यांना ३ लक्ष ५० हजार रुपये देण्यात येणार असल्याचे सांगितले
लेंडी धरणाच्या बुडीत क्षेत्रात इटग्याळ पमु. येथील ४५१ कुटुंबाचे घरे संपादीत झाल्याने यातील धरणग्रस्तांसाठी पुनर्वसन करण्यात आले आहे.आता फक्त १५ टक्के काम शिल्लक आहे.हे काम पुर्ण होताच.त्यांना भुखंडाचे वाटप करुण त्यांना प्रधानमंत्री आवास योजने अंतर्गत प्रत्येक बाधीत धरणग्रस्तास सुसज्ज पक्के घरे बांधून देण्यात येणार असल्याची माहिती जिल्हाधिकारी यांनी लेंडी प्रकल्पग्रस्त अंतर्गत नागरिकांना सुविधा हस्तांतर करण्यासाठी पहाणी करून प्लाॅट वाटप व स्वेच्छ पुनर्वसन बाबत आणि वाढीव कुटुंब गावकऱ्याशी चर्चा संवाद कार्यक्रम आयोजित करण्यात आले आहे.यावेळी सहाय्यक जिल्हाधिकारी सौम्या शर्मा, सहायक कार्तिकेय.एन.साहेब, जिल्हा पुनर्वसन अधिकारी डालकर मॅडम, अधिक्षक अभियंता शेट्टे, तहसीलदार काशिनाथ पाटील, लेंडी प्रकल्पग्र देगलूर नितीन कवर, गटविकास अधिकारी भालके, सरपंच बालाजी पाटील बनबरे, उपसरपंच संदीप पाटील अतनुरे, प्रतिष्ठित नागरिक प्रकल्पग्रस्त आणि शेतकरी उपस्थित होते.

Previous articleसरकारी नोकरीचे स्वप्न अपुरे राहणार..? राज्याच्या तिजोरीवर भार, महाविकास आघाडी सरकारचा मोठा निर्णय
Next articleपुणेत कोरोना नंतर अतिक्रमणाच्या नावाखाली बेरोजगारीचे संकट
युवा मराठा न्यूजपेपर्स आणि वेब पोर्टलवर प्रसिद्ध झालेल्या बातम्या व लेखांशी संपादक, मालक प्रकाशक  / अथवा मुद्रक सहमत असतीलच असे नाही. बातमी, लेख व जाहिरातीतील मजकूराची वैधता तपासून पाहू शकत नाही. बातमी, लेख व जाहिरातीतून उद्भवणाऱ्या कोणत्याही विषयाला युवा मराठा न्यूज जबाबदार नसून, संबंधित वार्ताहर, लेखक किंवा जाहिरातदारच आहे. युवा मराठा आँनलाईन वेब न्युज पोर्टल कुठलीही जबाबदारी घेत नाही. शिवाय वादविवाद हे मालेगांव, जि.नाशिक न्यायालयाअंतर्गतच चालविले जातील. भारत सरकारने फेब्रुवारी 2021 पासून अधिसूचित केलेल्या नव्या माहिती तंत्रज्ञान (मध्यस्थ मार्गदर्शक सूचना आणि डिजिटल माध्यमांसाठीची आचार संहिता) नियम 2021 अंतर्गत असलेल्या डिजिटल माध्यमांसाठीच्या आचार संहितेचे आम्ही पालन करतो. तरीही एखाद्या बातमीविषयी आपली तक्रार असल्यास आमच्या वेब माध्यमचे तक्रार निवारण अधिकारी आणि स्वनियमन संस्थेकडे विहित नमुन्यात अर्ज करू शकता. आपल्या तक्रारीचे निराकरण केले जाईल.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here