राजेंद्र पाटील राऊत
वानखेड ग्रामस्थांना पिण्यासाठी होतोय विषारी पाण्याचा वाटप.
वानखेड येथे पाणी टंचाईचा प्रश्न गंभीर
धरण उशाला ..कोरड घशला !!”
संग्रामपूर : (ता.प्र.) तालुक्यातील वानखेड गावामध्ये अनेक महिन्यांपासून दूषित पाण्याचा पुरवठा होत असल्याने नागरिकांना तेच पाणी प्यावे लागत आहे. १४० गाव पाणीपुरवठा योजना ही जरी कार्यान्वित असली तरी, वानखेड गावाला मुबलक प्रमाणात स्वच्छ पाणी मिळत नसल्याने गावातील नागरीकांना बोरवेल चे पाणी १४० गावच्या पाण्यामध्ये मिक्स करून ते दूषित पाणी पूर्ण गावांमध्ये पिण्यासाठी सोडण्यात येत आहे. त्यामुळे प्रत्येक कुटुंबाला दूषित पाणी प्यावे लागत आहे, परिणामी अनेक नागरिकांच्या जिवाला या दूषित पाण्यामुळे धोका निर्माण झालेला आहे. वास्तविक पाहता संग्रामपूर तालुक्यामध्ये सर्वात जास्त किडनी ग्रस्त रुग्ण असल्यामुळे या ठिकाणी १४० गाव पाणीपुरवठा योजना देण्यात आली परंतु आज पंधरा वर्षे होऊन सुद्धा वानखेड गावाला योग्य त्या प्रमाणामध्ये स्वच्छ पाण्याचा पुरवठा करण्यात येत नाही. नियमानुसार प्रति व्यक्तीला ५५ लिटर पाणी देणे आवश्यक आहे. वानखेड गावची लोकसंख्या ही अकरा हजारापेक्षा जास्त असून देखील त्या ठिकाणी फक्त ६० हजार लिटर पाण्याची क्षमता असलेलीच टाकी आहे. एवढ्या पाण्यामध्ये वानखेड गावाची तहान भागत नाही. वारंवार लोकप्रतिनिधिच्या कानावरती ही बाब टाकून सुद्धा आज पर्यंत वानखेड वासियांना मुबलक प्रमाणात स्वच्छ पाण्याचा पुरवठा करण्यात आलेला नाही.सारा समंदर मेरे पास है फिर भी एक बूंद प्यास है गावातील पाण्याची मागणी व 140 गाव पाण्याचा अपूरापूरठा यामूळे नाइलाजाने ग्रापंच्या उपलब्ध जलस्रोतातून पाणी पूरवठा करण्यात येत आहे जलस्रोत आटल्याने 15 वित्त आयोगातून जिल्हाधिकारी यांचे कडे ठराव व विनंती पत्राद्वारे ट्यूब वेल घेण्याची मागणी करण्यात आली आहे सरपंच ग्राम वानखेड श्रीमती मंगलाबाई रंगभाल व उप सरपंच राजू भाऊ पाखरे