Home उतर महाराष्ट्र देवळा आमदार डाँ राहुल आहेर यांच्या उपस्थितीत विज अधिकारी व कृषी अधिकाऱ्यांची...

देवळा आमदार डाँ राहुल आहेर यांच्या उपस्थितीत विज अधिकारी व कृषी अधिकाऱ्यांची बैठक संपन्न

149
0

राजेंद्र पाटील राऊत

देवळा,(भिला आहेर तालुका प्रतिनिधी युवा मराठा न्युज नेटवर्क) : येथील आमदार डॉ.राहुल आहेर यांच्या निर्देशानुसार तालुक्यातील कृषी वीज धोरण व वीज प्रश्नांबाबत तालुक्यातील लोकप्रतिनिधी, वीजग्राहक शेतकरी व अधिकारी यांची आज बुधवार (ता.२३) रोजी बैठक संपन्न झाली. यावेळी देवळा नगरपंचायतीचे उपनगराध्यक्ष जितेंद्र आहेर, माजी सरपंच भाऊसाहेब पगार, पंचायत समितीचे माजी सभापती केदा शिरसाठ, स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे जिल्हाध्यक्ष राजू शिरसाठ, सामाजिक कार्यकर्ते भिला आहेर, उपसरपंच भिका शिरसाठ आदि पदाधिकारी व शेतकरी प्रतिनिधी उपस्थित होते.

याप्रसंगी शेतकऱ्यांच्या वीजपुरवठ्याबाबतच्या समस्या मांडण्यात आल्या. पूर्ण दाबाने दिवसा वीजपुरवठा न होणे, जळालेले रोहित्र भरून देखील न मिळणे या मागण्या भाऊसाहेब पगार यांनी केल्या. याबाबत तातडीने अमलबजावणी करण्याचे तसेच असे रोहित्र त्वरित बदलून देण्याबाबत नियोजन करण्याच्या सूचना देण्यात आल्या. या बैठकीस महावितरण मालेगाव मंडळाचे अधीक्षक अभियंता रमेश सानप, कार्यकारी अभियंता रामसिंग राठोड, उपकार्यकारी अभियंता बंकट सुरवसे, कक्ष अभियंता रवींद्र खाडे, जितेंद्र देवरे व इतर अधिकारी उपस्थित होते. कृषीवीज धोरण २०२०, दहीवड सौरऊर्जा उपकेंद्रचा लेखाजोखा बंकट सुरवसे यांनी मांडला.

दि.२३/२/२०२२
भिला आहेर
देवळा:- येथील आमदार डॉ.राहुल आहेर यांच्या निर्देशानुसार तालुक्यातील कृषी वीज धोरण व वीज प्रश्नांबाबत तालुक्यातील लोकप्रतिनिधी, वीजग्राहक शेतकरी व अधिकारी यांची आज बुधवार (ता.२३) रोजी बैठक संपन्न झाली. यावेळी देवळा नगरपंचायतीचे उपनगराध्यक्ष जितेंद्र आहेर, माजी सरपंच भाऊसाहेब पगार, पंचायत समितीचे माजी सभापती केदा शिरसाठ, स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे जिल्हाध्यक्ष राजू शिरसाठ, सामाजिक कार्यकर्ते भिला आहेर, उपसरपंच भिका शिरसाठ आदि पदाधिकारी व शेतकरी प्रतिनिधी उपस्थित होते.

याप्रसंगी शेतकऱ्यांच्या वीजपुरवठ्याबाबतच्या समस्या मांडण्यात आल्या. पूर्ण दाबाने दिवसा वीजपुरवठा न होणे, जळालेले रोहित्र भरून देखील न मिळणे या मागण्या भाऊसाहेब पगार यांनी केल्या. याबाबत तातडीने अमलबजावणी करण्याचे तसेच असे रोहित्र त्वरित बदलून देण्याबाबत नियोजन करण्याच्या सूचना देण्यात आल्या. या बैठकीस महावितरण मालेगाव मंडळाचे अधीक्षक अभियंता रमेश सानप, कार्यकारी अभियंता रामसिंग राठोड, उपकार्यकारी अभियंता बंकट सुरवसे, कक्ष अभियंता रवींद्र खाडे, जितेंद्र देवरे व इतर अधिकारी उपस्थित होते. कृषीवीज धोरण २०२०, दहीवड सौरऊर्जा उपकेंद्रचा लेखाजोखा बंकट सुरवसे यांनी मांडला. यावेळी त्यांनी सांगितले कि, देवळा उपविभागात १४ हजार ४५७ कृषीग्राहक असून त्यांची थकबाकी ९८ कोटी ४३ लाख रु. इतकी आहे. त्यापैकी ९ हजार १९० ग्राहकांनी योजनेंतर्गत १७ कोटी रु.भरले तर २ हजार ७९३ कृषीग्राहकांनी या योजनेचा पूर्ण फायदा घेत थकबाकी शून्य केली. ज्या शेतकऱ्यांनी अद्यापपर्यंत योजनेत सहभाग घेतला नाही अशा ५ हजार २६७ ग्राहकांचा नियमानुसार वैयक्तिक विद्युतपुरवठा खंडित करण्यात येत आहे.

अधीक्षक अभियंता रमेश सानप म्हणाले कि, दहीवडच्या सोलर उपकेंद्रावरील थकबाकी एक कोटी ३५ लाख रु.आहे. महावितरण परिपत्रकानुसार सप्टेंबर २०२० पासूनची चालू बिलाची ८० टक्के रक्कम भरल्यास त्यांना दिवसा विद्युतपुरवठा दिला जाईल. ठेंगोडा उपकेंद्रात रोहित्र क्षमता वाढ करून वीजपुरवठा सुरळीत केला आहे. याशिवाय देवळा उपविभागात पिंपळगाव, खालप व देवळा शिवार येथे नवीन ३३/११ केव्ही उपकेंद्र प्रस्तावित करण्यात आले आहे.

Previous articleझाडूने परिसर आणि कीर्तनाने मनं साफ करणारे संत गाडगे महाराज यांना जयंतीनिमित्त विनम्र अभिवादन
Next articleजामखेड येथे श्री सुभाष ढवळे यांचा सामाजिक कार्याबद्दल सत्कार
युवा मराठा न्यूजपेपर्स आणि वेब पोर्टलवर प्रसिद्ध झालेल्या बातम्या व लेखांशी संपादक, मालक प्रकाशक  / अथवा मुद्रक सहमत असतीलच असे नाही. बातमी, लेख व जाहिरातीतील मजकूराची वैधता तपासून पाहू शकत नाही. बातमी, लेख व जाहिरातीतून उद्भवणाऱ्या कोणत्याही विषयाला युवा मराठा न्यूज जबाबदार नसून, संबंधित वार्ताहर, लेखक किंवा जाहिरातदारच आहे. युवा मराठा आँनलाईन वेब न्युज पोर्टल कुठलीही जबाबदारी घेत नाही. शिवाय वादविवाद हे मालेगांव, जि.नाशिक न्यायालयाअंतर्गतच चालविले जातील. भारत सरकारने फेब्रुवारी 2021 पासून अधिसूचित केलेल्या नव्या माहिती तंत्रज्ञान (मध्यस्थ मार्गदर्शक सूचना आणि डिजिटल माध्यमांसाठीची आचार संहिता) नियम 2021 अंतर्गत असलेल्या डिजिटल माध्यमांसाठीच्या आचार संहितेचे आम्ही पालन करतो. तरीही एखाद्या बातमीविषयी आपली तक्रार असल्यास आमच्या वेब माध्यमचे तक्रार निवारण अधिकारी आणि स्वनियमन संस्थेकडे विहित नमुन्यात अर्ज करू शकता. आपल्या तक्रारीचे निराकरण केले जाईल.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here