राजेंद्र पाटील राऊत
…शिवाजी विद्यापीठ, कोल्हापूर याला अपवाद का…? छत्रपती शिवाजी महाराज विद्यापीठ, कोल्हापूर का नाही…?
मुंबई (अंकुश पवार,मुंबई जिल्हा प्रतिनिधी, युवा मराठा वेब न्युज चॅनल अँड पेपर)
देशाभिमान कृती समिती ची शिवाजी विद्यापीठ, कोल्हापूर या विद्यापीठाचे नामकरण छत्रपती शिवाजी महाराज विद्यापीठ, कोल्हापूर करन्यासाठी महाराष्ट्रात पहिल्यांदा शासन दरबारी मागणी केली आहे.
आश्रय आशा फाउंडेशन प्रणित देशाभिमान कृती समिती, मुंबई ही महाराष्ट्रातील एकमेव चळवळ आहे जी महाराष्ट्रातील समाज सुधारक/क्रांतिकारक/हुतात्मे/संविधान/राष्ट्र ध्वज/ इ साठी कार्य करणारी संस्था आहे. जी ज्या ज्या गोष्टी समाजात वाईट प्रवृत्ती, देशाचा अपमान करत असतील त्या गोष्टीला अगदी नेटाने सक्षम पणे तीव्र आंदोलन,विरोध निदर्शने करीत असते. त्याच पार्शवभूमीवर शिवाजी महाराजांच्या एकिरी उल्लेख वारंवार या विद्यापीठाचे नाव घेताना होत असतो जो पूर्ण देशाचा महाराष्ट्राचे आराध्यदैवत छत्रपती शिवाजी महाराजांचा अपमान वर्षानुवर्ष होत आहे.
आश्रय आशा फाउंडेशन प्रणित देशाभिमान कृती समिती, मुंबई हा उपक्रम राबवित आहे. संपूर्ण जगात महाराष्ट्राचे आराध्यदैवत छत्रपती शिवाजी महाराज यांची नावे आदराने विकास कामे, संस्था, शासकीय योजना,रस्ते,रेल्वे स्टेशन,विभाग, विद्यापीठे,यांना देत आहे.
दुसरीकडे सन १९९२ पासून स्थापना झालेली शिवाजी विद्यापीठ, कोल्हापूर हे मात्र शिवाजी महाराजांच्या नावाने शैक्षणिक संस्था चालवते मात्र एकेरी नावामुळे महाराजांचा अपमान होत आहे. यामुळे देशाभिमान कृती समिती, मुंबई ने मुख्यमंत्री, उपुख्यमंत्री, राज्यपाल भगतसिंग कोषारी, उच्च तंत्र शिक्षण मंत्री उदय सामंत, प्रधान सचिव तसेच खुद्द शिवाजी विद्यापीठ, कोल्हापूर कुलपती, कुलगुरू यांना निवेदन दिले आहे.
आपल्या विद्यापीठाचे नाव छत्रपती शिवाजी महाराज विद्यापीठ, कोल्हापूर करावे तसेच संकेत स्थळावर नाव छत्रपती शिवाजी महाराज विद्यापीठ, कोल्हापूर करावे अशी विनंती या निवेदनात करण्यात आली आहे.