Home कोकण छावा प्रतिष्ठान रत्नागिरीचे सचिव समीर गोताड यांची रत्नागिरी तालुका संगणक परिचालक संघटनेच्या...

छावा प्रतिष्ठान रत्नागिरीचे सचिव समीर गोताड यांची रत्नागिरी तालुका संगणक परिचालक संघटनेच्या अध्यक्षपदी बिनविरोध निवड

65
0

राजेंद्र पाटील राऊत

छावा प्रतिष्ठान रत्नागिरीचे सचिव समीर गोताड यांची रत्नागिरी तालुका संगणक परिचालक संघटनेच्या अध्यक्षपदी बिनविरोध निवड

रत्नागिरी/सुनील धावडे ब्युरो चीफ युवा मराठा न्युज
दि १८.०२.२०२२ रोजी रत्नागिरी तालुका संगणक परिचालक संघटना कार्यकारणीची सभा रत्नागिरी येथे जिल्हाध्यक्ष हरीश वेदरे यांच्या अध्यक्षतेखाली संपन्न झाली.

त्यावेळी नवीन तालुका कार्यकारणी ची स्थापना करणेत आली असता ग्रुप ग्रामपंचायत बोंड्ये – नारशिंगे चे संगणक परिचालक तथा छावा प्रतिष्ठान रत्नागिरीचे मुख्य सचिव समीर गोताड यांची रत्नागिरी तालुका संगणक परिचालक संघटनेच्या अध्यक्षपदी बिनविरोध निवड करण्यात आली.

संगणक परिचालकांचे विविध प्रश्न मार्गी लावण्याचे, संघटन वाढिसाठी विशेष प्रयत्न करणार असे समीर गोताड यांनी सांगितले. यावेळी संघटनेचे आजी – माजी पदाधिकारी व सदस्य उपस्थित होते. त्याच्या अध्यक्ष निवडीने तालुका व जिल्हातील संगणक परिचालक संघटनेमध्ये उत्साहाचे वातावरण निर्माण झाले.

समीर गोताड हे विविध संघटनांचे प्रतिनिधीत्व करत असून ग्रांमपंचायत क्षेत्रातही त्यांचा विशेष अनुभव आहे. त्यामुळे सर्वानुमते त्यांची निवड करण्यात आली. छावा प्रतिष्ठाने संस्थापक /अध्यक्ष सुनिल धावडे, सर्व पदाधिकारी व सदस्य यांनी समीर गोताड यांचे विशेष कौतूक केले व अशीच संघटनेची पताका उंचावत रहाल व या पदाला न्याय द्याल अशी अपेक्षा व्यक्त करून पुढील वाटचालीस खूप शुभेच्छा दिल्या.

Previous articleग्रुप ग्रामपंचायत बोंडये नारशिंगे छत्रपती शिवाजी महाराज जयंती उत्साहात साजरी.
Next articleगटविकास अधिकारी मुखेड यांनी दिव्यांगाच्या शिष्टमंडळा सोबत खालील प्रश्नाची चर्चा करुन संबधितास दिले आदेश
युवा मराठा न्यूजपेपर्स आणि वेब पोर्टलवर प्रसिद्ध झालेल्या बातम्या व लेखांशी संपादक, मालक प्रकाशक  / अथवा मुद्रक सहमत असतीलच असे नाही. बातमी, लेख व जाहिरातीतील मजकूराची वैधता तपासून पाहू शकत नाही. बातमी, लेख व जाहिरातीतून उद्भवणाऱ्या कोणत्याही विषयाला युवा मराठा न्यूज जबाबदार नसून, संबंधित वार्ताहर, लेखक किंवा जाहिरातदारच आहे. युवा मराठा आँनलाईन वेब न्युज पोर्टल कुठलीही जबाबदारी घेत नाही. शिवाय वादविवाद हे मालेगांव, जि.नाशिक न्यायालयाअंतर्गतच चालविले जातील. भारत सरकारने फेब्रुवारी 2021 पासून अधिसूचित केलेल्या नव्या माहिती तंत्रज्ञान (मध्यस्थ मार्गदर्शक सूचना आणि डिजिटल माध्यमांसाठीची आचार संहिता) नियम 2021 अंतर्गत असलेल्या डिजिटल माध्यमांसाठीच्या आचार संहितेचे आम्ही पालन करतो. तरीही एखाद्या बातमीविषयी आपली तक्रार असल्यास आमच्या वेब माध्यमचे तक्रार निवारण अधिकारी आणि स्वनियमन संस्थेकडे विहित नमुन्यात अर्ज करू शकता. आपल्या तक्रारीचे निराकरण केले जाईल.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here