राजेंद्र पाटील राऊत
सन्मान निधीच्या तक्रारी सोडविण्यासाठी सज्जानिहाय कॅम्प घ्या-शिवशंकर पा.कलंबरकर
नांदेड,/मनोज बिरादार ब्युरो चीफ युवा मराठा न्युज नेटवर्क
सरकारने शेतकऱ्यांना पंतप्रधान सन्मान निधी अंतर्गत 2000 रुपयांचा हप्ता वर्षातून तीनवेळा देणारी योजना 2018 पासून सुरू केली आहे.या योजनेसाठी पात्र असून देखील आजप्रयन्त एकही हप्ता न मिळालेल्या शेतकऱ्यांची संख्या मुखेड तालुक्यात खूप मोठी आहे.या पात्र असून देखील वंचित असलेल्या शेतकऱ्यांना,या योजनेचा लाभ मिळवून दिला पाहिजे.शेतकरी सन्मान निधीच्या लाभासाठी सारख्या प्रशासनाकडे चकरा मारत आहे.अनेक शेतकऱ्यांनी तहसील कार्यालयाकडे तक्रारी दाखल केल्या आहेत.या तक्रारी निकाली निघाल्या पाहिजेत.शेतकऱ्यांच्या सन्मान निधीच्या (दोन हजार रुपयाचा हप्ता) तक्रारी सोडवण्यासाठी तालुक्यात सज्जानिहाय कॅम्प घ्या,अशी मागणी तहसीलदार काशीनाथ पाटील यांच्याकडे स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे जिल्हाध्यक्ष शिवशंकर पाटील कलंबरकर यांनी निवेदनातून केली आहे.
सन्मान निधीसाठी पात्र असून लाभ न मिळालेल्या शेतकऱ्यांसोबत इतर अन्य तक्रारी आहेत.नावात व खाते नंबरमध्ये झालेली चूक,यामुळे एका व्यक्तीचे पैसे दुसऱ्या व्यक्तीच्या खात्यात जमा झाले.काहींना एक दोन हप्ते जमा झाले नंतर हप्ते बंद झाले.अशा अडचणी असलेल्या शेतकऱ्यांची संख्या खूप मोठी आहे.या वंचित असलेल्या लाभधारकांना लाभ मिळवून देण्यासाठी तालुक्यात सज्जानिहाय कॅम्प घेऊन हे प्रश्न सोडवले पाहिजेत.(दोन हजार रुपयाचा हप्ता) सन्मान निधीचा लाभ न मिळालेल्या शेतकऱ्यांमध्ये याबद्दल तिव्र संताप आहे,असा निवेदनात उल्लेख करण्यात आला आहे.