राजेंद्र पाटील राऊत
पालघर,(वैभव पाटील विभागीय संपादक युवा मराठा न्युज नेटवर्क) विक्रमगड तालुक्यातील आदिम कातकरी जमातीचे रघुनाथ जाधव यांच्या आत्महत्येला जबाबदार असलेल्या पोलीस अधिकाऱ्यांना निलंबित करून गुन्हे दाखल करावे , या मागणीसाठी अदिवासी एकता मित्र मंडळाचे संतोष जनाठे यांच्या नेतृत्वाखाली कातकरी आदिवासी संघटना महाराष्ट्र अध्यक्ष रमेश सावरा व कार्यकर्ते यांनी पालघर जिल्हा पोलीस अधीक्षक प्रकाश गायकवाड यांची भेट घेतली. या वेळी जनाठे यांनी संबंधित रघुनाथ जाधव यांच्या कुटूंबियांना न्याय मिळावा , अशी मागणी करून संबंधित पोलीस अधिकाऱ्यांवर गुन्हा दाखल करावा, अशी मागणी केली.
मृत्यू च्या पूर्वी लिहिली होती चिट्ठी
आत्महत्येपूर्वी त्यांनी लिहीलेली चिठ्ठी त्यांनी आपले चुलत भाऊ रमेश जाधव कडे देत आपल्या मृत्यू ला जबाबदार सपोनि प्रदीप गीते व शेजारी राहणारे रोशन गावित ,विमल गावित , योगेश गावीत, पंढरी गावित हे जबाबदार आहेत असे लिहले आहे.