Home विदर्भ राजाराम येथे नागरिकांशी विकास कामांवर चर्चा..!! जिल्हा परिषद अध्यक्ष श्री.अजयभाऊ कंकडलवार यांनी...

राजाराम येथे नागरिकांशी विकास कामांवर चर्चा..!! जिल्हा परिषद अध्यक्ष श्री.अजयभाऊ कंकडलवार यांनी जाणून घेतली समस्या..!!

70
0

राजेंद्र पाटील राऊत

राजाराम येथे नागरिकांशी विकास कामांवर चर्चा..!!

जिल्हा परिषद अध्यक्ष श्री.अजयभाऊ कंकडलवार यांनी जाणून घेतली समस्या..!!

विविध समस्या जाणून घेतली..!!
गडचिरोली,(सुरज गुंडमवार ब्युरो चीफ युवा मराठा न्युज)
अहेरी तालुक्यातील राजाराम येते जिल्हा परिषद अध्यक्ष श्री.अजयभाऊ कंकडालवार यांनी व्हलिबाल सामनेच्या उदघाटनासाठी आले होते.तेंव्हा ग्राम पंचायत कार्यालय राजाराम येते नागरिकांनी चर्चासाठी बोलावले राजाराम गावात विविध समस्या आहेत.मात्र प्रमुख समस्या या ठिकाणी कृषि गोदाम नसल्याने या परिसरातील चिरेपली,पत्तीगाव,मरनेली,खाँदला,
गोलाकर्ज्जी,रायगटा आदि गावातीला शेतकऱ्यांना धान्य विक्रीसाठी कमलापूर येते न्यावे लागते त्यामुळे शेतकऱ्यांना आर्थिक,मानसिक त्रास सहन करवा लागत असल्याचे यावेळी नागरिकांनी सांगितले.व गेल्या कित्येक वर्षापासून या ठिकाणी पाण्याची टाकी आहे,मात्र नळ योजना बंद असल्याचे सांगण्यात आले.
यावेळी जि.प.अध्यक्ष यांनी सांगितले कि जिल्हा परिषदेतून एक नवीन कृषि गोदाम,व नळ योजनेसाठी येत्या काही दिवसांतच निधी उपलब्ध करून देवून सदर समस्या सोडवून देवू असे शब्द दिले आहे.
यावेळी उपस्थित अहेरी पंचायत समितीचे सभापती भास्कर भाऊ तलाडे,जिल्हा परिषद सदस्य अजय नैताम, राजारामचे सरपंच नागेश कन्नाके,उपसरपंच सुरक्षा आकदर ,ग्राम पंचायत सदस्य नारायण कंबगोनिवार,सपना तलांडे,माजी सरपंच ज्योती जूमनाके, प्रिया पोरतेट,माजी सरपंच शंकुतला कुडमेथ खांदला,श्री सुभाष सावकार मारगोनवार ,माजी उपसरपंच भगवान मडावी,लींबुना गोंगले,सुरेश पेंदाम,चंद्रशाहा आलाम,गंगाराम आत्राम,संजय पोरतेट माजी उपसरपंच,सुरेश सोयाम,सुधाकर आत्राम,रमेश पोरतेट,समया अंबिलेपवार,राकेश सडमेक,मांता सोयाम,आदि मोठया संख्येने गावकरी उपस्थित होते..!!

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here