राजेंद्र पाटील राऊत
ग्रामपंचायतींची वीज बिले राज्य सरकार भरणार..! राज्यसरकार ग्रामपंचायतींसाठी दयावान
ठाणे – ( अंकुश पवार, ठाणे शहर प्रतिनिधी, युवा मराठा न्यूज चॅनल)
आमदार श्री. निलेश लंके यांनी ग्रामविकास मंत्री तथा पालकमंत्री हसन मुश्रीफ यांच्या मार्फत पाठपुरावाकरून ग्रामपंचायतींची वीज बिले राज्य सरकार भरण्याच्या प्रस्ताव मान्य केल्याचे समजते…अशी माहिती आमदार लंके यांनी दिली. या संदर्भात विविध मतदार संघातील पदाधिकाऱ्यानी वीज बिले सरकारने भरावीत अशी मागणी केली होती.
कारोणा काळात उत्पन्न घटल्याने पथदिवे व पाणीपुवठा योजनांची बिले राज्य सरकारने भरण्याच्या निर्णय घेतला आहे.
महावितरण कंपनीकडून पाणीपुरवठा योजनांची लाखोंची बिले ग्रामपंचायतीना पाठवली आहेत.
सामान्य जनतेने वीज बिल नाही भरले, तर कनेक्शन महवितरण कट करते मग राज्य सरकार ग्रामपंचायतींची वीज बिले कशी भरणार.,?
आमदार श्री. निलेश लंके म्हणाले संबंधित वीज बिले हे १५ व्या वित्त आयोगाच्या निधीतून भरण्याचे परवानगी राज्य सरकारने दिली होती, परंतु या निधीमध्ये वीज बिले भरण्यासाठी रक्कम उपलब्ध नाही. हा निधी विजेचे बिले भरण्यासाठी वापरला तर त्या गावांतील इतर कामांना खीळ बसणार असल्याचे राज्य सरकारच्या निदर्शनास आणून दिले असल्याचे आमदार निलेश लंके म्हणाले