राजेंद्र पाटील राऊत
सटाणा-(शशिकांत पवार प्रतिनिधी युवा मराठा न्युज)
आदर्शगाव ,स्मार्ट व्हिलेज ,तंटामुक्त गाव, निर्मल ग्राम असे अनेक राज्यस्तरीय पुरस्कार प्राप्त असलेले गाव म्हणून नवे निरपूर या गावाची वेगळी ओळख असून या गावात नेहमी इतर गावानंपेक्षा वेगळच’ जरा हटके ‘कार्य करीत इतर गावांपुढे आदर्श निर्माण करत असत.
त्याप्रमाणे या वर्षी माझी वसुंधरा अभियानात ग्रामस्थ ,ग्रामपंचायत यांनी पर्यावरणाची व नैसर्गिक घटकांची संरक्षण व सुरक्षितता करण्याची ,रक्षण करण्याची शपथ घेतली आहे त्यानुसार यावर्षी ग्रामपंचायत ने गावातील सर्व गणपती मूर्तींचे विसर्जन करण्यासाठी ग्रामपंचायतीच्या समोर कृतीम कुंड तयार करून त्या कुंडात गणपती मूर्तींचे विसर्जन केले व निर्माल्य देखील एका ठिकाणी जमा करून निर्माल्यची योग्य विल्हेवाट लावून पर्यावरण पूरक घटकांची हानी होणार नाही याची दक्षता घेऊन हे एकत्र संकलित करून त्याची विल्हेवाट लावण्याचे ठरवले आहे त्यामुळे असा उपक्रम करत नवे निरपूर ग्रामपंचायतीने ‘माझी वसुंधरा अभियानात ‘घेतली शपथ घेतलेली शपथ सार्थ ठरवत इतर गावानंपुढे वेगळा आदर्श निर्माण केला आहे. त्यामुळे गावाच्या या अनोख्या वअभिनव उपक्रमाबाबत सर्वत्र कौतुक होत आहे. हा उपक्रम यशस्वीतेसाठी सरपंच मुन्ना सूर्यवंशी माजी सरपंच भाऊसाहेब, सामाजिक कार्यकर्ते निलेश सूर्यवंशी, उपसरपंच ,सदस्य, ग्रामपंचायत कर्मचारी नंदू सूर्यवंशी शिवाजी शिंदे यांनी अथक परिश्रम घेतले.