Home Breaking News विमाकंपनीला पावसाअभावी झालेल्या पीकनुकसानीचे पंचनामे करण्याचे आदेश द्या – शिवशंकर पा.कलंबरकर.

विमाकंपनीला पावसाअभावी झालेल्या पीकनुकसानीचे पंचनामे करण्याचे आदेश द्या – शिवशंकर पा.कलंबरकर.

108
0

विमाकंपनीला पावसाअभावी झालेल्या पीकनुकसानीचे पंचनामे करण्याचे आदेश द्या – शिवशंकर पा.कलंबरकर.
मुखेड तालुका प्रतिनिधी मनोज बिरादार (युवा मराठा न्यूज नेटवर्क)

गेल्या अनेक दिवसांपासून पावसात खंड पडल्यामुळे पिकं वाळत आहेत.आज रोजी मूग,उडीद ही पिके गेली,सोयाबीन उत्पन्नात 60% घट झाली.पिकविम्याच्या करारानुसार पावसात खंड पडून नुकसान झालेल्या पिकाला विमा मंजूर होतो.पण,पिकविम्याच्या बाबतीत शेतकरी हिताच्या नियमांची अंमलबजावणी करायची नाही.आणि विमा कंपनीच्या हिताचे नियमांची अंमलबजावणी करायची हा प्रकार गेल्या दोन वर्षांपासून मुखेड-देगलूर तालुक्यात चालू आहे.यामुळे शेतकऱ्यांवर अन्याय होत आहे.विमा कंपनीला आदेशीत करून,पावसाअभावी वाळत असलेल्या पिकांचे पंचनामे करून,शेतकऱ्यांना नुकसानभरपाई देण्यात यावी,अशी मागणी स्वाभिमानी शेतकरी संघटनेकडून उपविभागीय कृषी अधिकारी सोनटक्के साहेब यांना करण्यात आली आहे.
शेतकऱ्यांच्या नशिबी आस्मानी व सुलतानी संकटाचा सामना कायम आहे,हे सत्य आहे.यावर्षी खरिपाची पेरणी चांगली झाली होती.पिके चांगली आली होती.पण,येणं पिकं फुलांमध्ये आल्यावर पावसाने मोठी तड दिली त्यामुळे मूग,उडीद ही पिके गेली.सोयाबीनचे 60% टक्के नुकसान झाले आहे.सोयाबीनला चांगला भाव होता.सोयाबीन पिकलं असते तर शेतकऱ्यांचे अनेक प्रश्न सुटले असते.जेव्हा शेतकऱ्यांकडे माल असत नाही,तेव्हा मालाला भाव असतो, ही कृषिप्रधान देशाची शोकांतिका आहे.
वाळत असलेल्या पिकांचे पंचनामे करण्यासाठी विमा कंपनीला आदेश द्या.तालुका कृषी कार्यालयात ऑफिस नसलेल्या विमा प्रतिनिधीवर कार्यवाही करा.विमा कंपनीच्या प्रतिनिधीकडून पंचनामे करण्यासाठी पैसे घेतले जात आहेत,त्याच्यावर कार्यवाही करा.
अशी मागणी शेतकरी संघटनेचे जिल्हाध्यक्ष शिवशंकर पाटील कलंबरकर यांनी केली आहे.यावेळी स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे देगलूर तालुकाध्यक्ष विष्णू पाटील मलकापूरकर,राजेश्वर पाटील,उत्तम देशमुख,राहुल नागदरवाड उपस्थित होते.

Previous articleपावसाअभावी पिके करपू लागली.
Next articleपिक विम्याकरिता महाराष्ट्र नवनिर्माण सेनेची जिल्हा अधिकारी कार्यालय धडक.
युवा मराठा न्यूजपेपर्स आणि वेब पोर्टलवर प्रसिद्ध झालेल्या बातम्या व लेखांशी संपादक, मालक प्रकाशक  / अथवा मुद्रक सहमत असतीलच असे नाही. बातमी, लेख व जाहिरातीतील मजकूराची वैधता तपासून पाहू शकत नाही. बातमी, लेख व जाहिरातीतून उद्भवणाऱ्या कोणत्याही विषयाला युवा मराठा न्यूज जबाबदार नसून, संबंधित वार्ताहर, लेखक किंवा जाहिरातदारच आहे. युवा मराठा आँनलाईन वेब न्युज पोर्टल कुठलीही जबाबदारी घेत नाही. शिवाय वादविवाद हे मालेगांव, जि.नाशिक न्यायालयाअंतर्गतच चालविले जातील. भारत सरकारने फेब्रुवारी 2021 पासून अधिसूचित केलेल्या नव्या माहिती तंत्रज्ञान (मध्यस्थ मार्गदर्शक सूचना आणि डिजिटल माध्यमांसाठीची आचार संहिता) नियम 2021 अंतर्गत असलेल्या डिजिटल माध्यमांसाठीच्या आचार संहितेचे आम्ही पालन करतो. तरीही एखाद्या बातमीविषयी आपली तक्रार असल्यास आमच्या वेब माध्यमचे तक्रार निवारण अधिकारी आणि स्वनियमन संस्थेकडे विहित नमुन्यात अर्ज करू शकता. आपल्या तक्रारीचे निराकरण केले जाईल.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here