Home Breaking News वजिरखेडेतील पोल्ट्री फार्म बंद करण्याच्या मागणीसाठी ग्रामस्थांचा आत्मदहनाचा इशारा !

वजिरखेडेतील पोल्ट्री फार्म बंद करण्याच्या मागणीसाठी ग्रामस्थांचा आत्मदहनाचा इशारा !

730
0

वजिरखेडेतील पोल्ट्री फार्म बंद करण्याच्या मागणीसाठी ग्रामस्थांचा आत्मदहनाचा इशारा !
(राजेंद्र पाटील राऊत युवा मराठा न्युज)
मालेगांव- नाशिकच्या मालेगांव तालुक्यातील वजिरखेडे गावातील गट नं. ७९ आणि ८८ मध्ये बनविण्यात आलेले पोल्ट्री फाँर्म येत्या ८आँगस्टपर्यत कायमस्वरुपी बंद न केल्यास क्रांतीदिनी ९ आँगस्ट रोजी सामूहिक आत्मदहनाचा इशारा वजिरखेडे ग्रामस्थांनी मुख्यमंत्री उध्दव ठाकरे यांना पाठविलेल्या निवेदनातून दिला आहे.
मुख्यमंत्री ठाकरे यांना पाठविलेल्या निवेदनातून वजिरखेडे गावाशेजारील निकम वस्ती व सुकदेव वेडू पाटील नगरातील रहिवाश्यांनी म्हटले आहे की,वजिरखेडे गावाच्या गट नं. ७९ व ८८ मध्ये शशिकांत तिसगे आणि रमाकांत तिसगे यांनी पोल्ट्री व्यवसाय उभारलेला असून, या पोल्ट्री फार्ममुळे परिसरातील नागरिकांचे आरोग्य धोक्यात आलेले असून,लहान बालकांना अतिसार,डायरिया कावीळ सारख्या आजारांचा सामना करावा लागत आहे,त्याशिवाय सातत्याने घोगावणा-या माशामुळे नागरिकांचे जीवन जगणे नरकयातानेपेक्षा भयानक झालेले आहे.परिसरात या पोल्ट्री व्यवसायामुळे घाणेरडा वास व फैलावणा-या दुर्गधीयुक्त वासामुळे नागरिकांच्या आरोग्यावर विपरीत परिणाम होत आहे.तरीदेखील सदरचा पोल्ट्री व्यवसाय हा ग्रामपंचायतच्या संगनमताने व राजकीय वरदहस्तामुळे खुलेआम सुरु असल्याने नागरिक त्रस्त झालेले आहेत.येत्या ८आँगस्ट पर्यत सदरचा पोल्र्ट्री उद्योग कायमस्वरुपी बंद न केल्यास क्रांतीदिनी ९ आँगस्टला निकम वस्तीवरील व सुकदेव वेडू पाटील नगरातील रहिवाश्यांनी अप्पर जिल्हाधिकारी कार्यालयासमोर सामूहिक आत्मदहनाचा इशारा निवेदनातून दिला आहे.निवेदनाच्या प्रती सर्व प्रशासकीय अधिकाऱ्यांना पाठविण्यात आल्या आहेत.

Previous articleपुणे विश्रामबागवाडा हाद्दीतील नॉनव्हेज खुप छान आहे म्याडम आसे एक पोलिस कर्मचारी सांगतो आहे वरिष्ठ अधिकारी प्रियंका नानवरे यांना
Next articleमहाड पूरग्रस्तांसाठी आरोग्य सेवा
युवा मराठा न्यूजपेपर्स आणि वेब पोर्टलवर प्रसिद्ध झालेल्या बातम्या व लेखांशी संपादक, मालक प्रकाशक  / अथवा मुद्रक सहमत असतीलच असे नाही. बातमी, लेख व जाहिरातीतील मजकूराची वैधता तपासून पाहू शकत नाही. बातमी, लेख व जाहिरातीतून उद्भवणाऱ्या कोणत्याही विषयाला युवा मराठा न्यूज जबाबदार नसून, संबंधित वार्ताहर, लेखक किंवा जाहिरातदारच आहे. युवा मराठा आँनलाईन वेब न्युज पोर्टल कुठलीही जबाबदारी घेत नाही. शिवाय वादविवाद हे मालेगांव, जि.नाशिक न्यायालयाअंतर्गतच चालविले जातील. भारत सरकारने फेब्रुवारी 2021 पासून अधिसूचित केलेल्या नव्या माहिती तंत्रज्ञान (मध्यस्थ मार्गदर्शक सूचना आणि डिजिटल माध्यमांसाठीची आचार संहिता) नियम 2021 अंतर्गत असलेल्या डिजिटल माध्यमांसाठीच्या आचार संहितेचे आम्ही पालन करतो. तरीही एखाद्या बातमीविषयी आपली तक्रार असल्यास आमच्या वेब माध्यमचे तक्रार निवारण अधिकारी आणि स्वनियमन संस्थेकडे विहित नमुन्यात अर्ज करू शकता. आपल्या तक्रारीचे निराकरण केले जाईल.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here