राजेंद्र पाटील राऊत
पिंम्पळनेर -ताहाराबाद – सटाणा महामार्गाची दैनिय अवस्था ,रस्ताची अक्षरशा चाळण . नागरिक जिवमुठीत धरून प्रवास करत आहे
सटाणा,(जगदिश बधान विशेष प्रतिनिधी युवा मराठा न्युज नेटवर्क)
गेल्या ६ महिन्यानपासुन पिंम्पळनेर – ताहाराबाद – सटाणा राष्ट्रीय महामार्ग संम्बधित कंम्पनिने खोदुन ठेवला आहे त्यामुळे रस्त्यावर वाहन चालवणे बेजार झाले आहे . गेल्या ६ महिन्यात अनेक अपघात होऊन अनेकांनी आपले प्राण गमावले आहे तरी संम्बधित रस्ता बनवणार्या कंम्पनीस सदर लोकप्रतिनिधी , शेतकरी नेते ,सामाजिक कार्यकर्ते ,प्रशासनाने जाब विचारावा . आज पिंम्पळनेर महामार्गावर कांद्याचे ट्रँक्टर घेऊन जाण्याची वेळ आली असता सदर प्रकार पाहिला व अत्यंत संताप झाला . हजारो वाहनांनी पिंम्पळनेर – ताहाराबाद – सटाणा महामार्गावर प्रवास करणेच टाळले आहे .त्यांनी अन्य ईतर पर्यायी मार्ग वापरत आहे . पण शेतकऱ्यांना बिचार्यांना आपला कांदा वाहतुक ट्रँक्टर ,पिक अप ,रिक्षा ,टँम्पो याच वहानातुन कराविच लागते. अति खराब झालेल्या रस्त्यावरूनच कांदा वहातुक करतांना दिवसाच घाम फुटतो .अंगावर काटे येतात . वहान कंन्ट्रोल करून करून गेयर बदलुन बदलुन जिव मेटाकुटीस येतोय . अनेक ठिकाणी रूंद रस्ता ,शेकडो ठिकाणी मोठ मोठे खड्डे . रस्ते बनवणार्या कंम्पनिने सदर अपघातग्रस्त वळणावर ,काम सुरू आहे अशा ठिकाणी दिशादर्शक फलक लावावे , योग्य ठिकाणी बँरेकेस्ट लावावे , अनेक ठिकाणी रस्त्यावर रेडियम लावणे गरजेचे आहे व अन्य ऊपाय योजना करणे महत्त्वाचे आहे . फक्त वेळ कमी आहे म्हणुन वरवर काम होता कामा नये .तसे होत असल्यास स्थानिक प्रशासन ,लोकप्रतिनिधी ,पत्रकार , सामाजिक कार्यकर्ते ,शेतकरी नेते यांनी संम्बधित कंम्पनीच्चा रस्ते कामाची चौकशी करावी व सध्या वहातुक करत असलेला रस्ता डागडुजी करावा . अनेक ठिकाणी झालेल्या कामावर पाणी मारलेले नाही . काय योग प्रकारे शासनाचे मानंकणाप्रमाणे होत आहे का ते पाहिले पाहिजे . आज जिथे काम सुरू आहे तेथेच रस्त्याच्या परिघात अनेक विज मंडळाचे पोल येत आहे अगोदर ते लांब शिफ्ट होणे महत्त्वाचे आहे . विविध शासकीय यंत्रणेत ताळमेळ दिसत नाही .याचा सर्व त्रास सर्वसामान्य जनतेला ,शेतकऱ्यांना होत आहे .तरी माझ्या सर्वच शेतकरी नेत्यांना नम्र विनंती ,आवाहन आहे आपण सर्व नेत्यांनी एक, एक कांद्याचे भरलेले लोडिंग ट्रँक्टर पिंम्पळनेर ते सटाणा ,पिंम्पळगाव बं. येथील मार्केट पर्यंत पोहचुन दाखवावे तेव्हा आपणास कळेल शेतकरी व वहातुक दारास किती त्रास होतोय . कांदा पिकवणे सोपे झाले आहे पण तो मार्केट मध्ये विकणे कठीण होऊन बसले आहे . अनेक कांद्याचे ट्रँक्टर या रस्त्यावर अपघातग्रस्त झालेले आहे .अनेकांच्चा वहानांचे नुकसान झाले आहे .तरी संम्बधित सर्वच माझ्या लोकप्रतिनिधीनी यांची गंभिर दखल देऊन एकदा या कामाची पहाणी करावी
✍🏻