Home माझं गाव माझं गा-हाणं तौक्ते चक्रिवादळामध्ये नुकसानग्रस्त मच्छीमार बांधवांना न्याय मिळवून देण्यासाठी आमदार राजेश पाटील यांनी...

तौक्ते चक्रिवादळामध्ये नुकसानग्रस्त मच्छीमार बांधवांना न्याय मिळवून देण्यासाठी आमदार राजेश पाटील यांनी घेतली मस्त्य व्यवसाय व बंदर विकास मंत्री श्री अस्लम शेख यांची भेट.

133
0

राजेंद्र पाटील राऊत

तौक्ते चक्रिवादळामध्ये नुकसानग्रस्त मच्छीमार बांधवांना न्याय मिळवून देण्यासाठी आमदार राजेश पाटील यांनी घेतली मस्त्य व्यवसाय व बंदर विकास मंत्री श्री अस्लम शेख यांची भेट.
पालघर,(वैभव पाटील विभागीय संपादक युवा मराठा न्युज नेटवर्क)-
दिनांक १६ मे,ते १८ मे दरम्यान राज्यात आलेल्या तौक्ते चक्रीवादळामुळे कोकण किनारपट्टी लागत असलेल्या गावांचे तसेच पालघर जिल्ह्यातील मच्छीमारांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झालेले आहे, शासनाकडून दिल्या जाणा-या नुकसान भरपाई निकषांमध्ये मच्छीमार बांधवांचा आपुलकीने विचार व्हावा म्हणून आमदार राजेश पाटील यांनी मत्स्य व्यवसाय व बंदर विकास मंत्री श्री अस्लम शेख साहेब* यांची त्यांच्या शासकीय निवासस्थानी भेट घेटली व खालील दोन पर्याय सुचविले.
१) पालघर जिल्ह्यात एकूण १२ बोटी चक्रीवादळात फुटून पूर्णतः नष्ट झाल्या असून २ कोटींचा निधी १२ बोट मालकांना देण्यात यावा,जेणेकरून नुकसान ग्रस्त बोट मालकांना त्यांचा व्यवसाय नव्याने उभा करता येईल.
२) पुर्ण नुकसान झालेल्या बोट मालकांचे थकीत कर्जाचे नवीन कर्जात रूपांतर करून वाढीव कर्ज देऊन किमान पाच वर्ष बिनव्याजी कर्ज मिळाल्यास नुकसान ग्रस्त मच्छीमारांना आपला व्यवसाय उभा करण्यास व अभिमानाने जगण्यास मदत होईल.
या वेळी आमदार राजेश पाटील व इतर उपस्थित होते.

Previous articleजीवनावश्यक वस्तूंचे दुकाने बंद ठेवून वडगांवातील व्यापाऱ्यांच्या आंदोलनास उत्स्फूर्त पाठींबा.
Next articleशेतकऱ्यांची फसवणूक केल्याप्रकरणी इफको टोकियो पिक विमा कंपनी वर तात्काळ फसवणुकीचा गुन्हा दाखल करून कृषी आयुक्तालय पुणे यांच्या संदर्भीय पत्रानुसार पिक विमा मंजूर करण्याची मागणी.
युवा मराठा न्यूजपेपर्स आणि वेब पोर्टलवर प्रसिद्ध झालेल्या बातम्या व लेखांशी संपादक, मालक प्रकाशक  / अथवा मुद्रक सहमत असतीलच असे नाही. बातमी, लेख व जाहिरातीतील मजकूराची वैधता तपासून पाहू शकत नाही. बातमी, लेख व जाहिरातीतून उद्भवणाऱ्या कोणत्याही विषयाला युवा मराठा न्यूज जबाबदार नसून, संबंधित वार्ताहर, लेखक किंवा जाहिरातदारच आहे. युवा मराठा आँनलाईन वेब न्युज पोर्टल कुठलीही जबाबदारी घेत नाही. शिवाय वादविवाद हे मालेगांव, जि.नाशिक न्यायालयाअंतर्गतच चालविले जातील. भारत सरकारने फेब्रुवारी 2021 पासून अधिसूचित केलेल्या नव्या माहिती तंत्रज्ञान (मध्यस्थ मार्गदर्शक सूचना आणि डिजिटल माध्यमांसाठीची आचार संहिता) नियम 2021 अंतर्गत असलेल्या डिजिटल माध्यमांसाठीच्या आचार संहितेचे आम्ही पालन करतो. तरीही एखाद्या बातमीविषयी आपली तक्रार असल्यास आमच्या वेब माध्यमचे तक्रार निवारण अधिकारी आणि स्वनियमन संस्थेकडे विहित नमुन्यात अर्ज करू शकता. आपल्या तक्रारीचे निराकरण केले जाईल.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here