इचलकरंजी : पंचगंगा नदीघाट येथील इचलकरंजीचे जहागीरदार घोरपडे सरकार यांचे समाधी स्थळ व पुरातन काळातील शिवमंदिर यांच्या दुरुस्तीकडे अनेक वर्षे दुर्लक्ष झाले होते.
संबंधित विषयासाठी नगरसेवक मदन कारंडे, नगराध्यक्षा सौ. अलका स्वामी, उपनगराध्यक्ष मा. तानाजी पोवार, बांधकाम सभापती मा. उदयसिंग पाटील यांच्या विशेष प्रयत्नातून जहागीरदार नारायणराव घोरपडे सरकार यांचे समाधी स्थळ, तसेच त्यांचे कुटुंबीय आऊसाहेब आणि माईसाहेब यांच्या समधीवरील तुळशी कट्टे दुरुस्त करून त्यांची पुनर्बांधणी करण्यात आली, वाटसरूंच्या विश्रांती साठी असलेल्या आश्रम इमारतीचीसुद्धा पडझड झाली होती. ती इमारत तसेच पुरातन शिवमंदिराची दुरुस्ती करून रंगकाम केल्यामुळे त्या ठिकाणी नवी झळाळी आली आहे. केलेल्या रंगरंगोटी आणि दुरुस्तीमुळे या परिसराचे रूप पलटले आहे.




