राजेंद्र पाटील राऊत
माजी पंचायत समिती सदस्य आत्माराम बोरसे यांचे निधन
कळवाडी,(जगदिश बागूल प्रतिनिधी युवा मराठा न्युज नेटवर्क)– म्हाळदे ता.मालेगांव गांवचे रहिवाशी व म्हाळदे गावचे अनेक वर्ष सरपंचपद भुषविलेले आत्माराम रतन बोरसे यांचे आज दुपारी वृध्दापकाळाने निधन झाले.
आत्माराम रतन बोरसे हे धार्मिक व वारकरी सांप्रदायाचे होते.त्यांनी आपल्या कार्यकाळात म्हाळदे गावाच्या विकासासाठी मोठे योगदान दिलेले होते.धार्मिक व परोपकारी वृतीमुळे ते पंचक्रोशीत अप्पा म्हणून नावारुपास आलेले होते.गोरगरिबांच्या सुख दुःखात व अडीअडचणीत धावून जाण्याची सदैव वृती त्यांच्या अंगी भिनलेली होती.हिरे घराण्याचे अत्यंत जवळचे निकटवर्तीय म्हणून त्यांची ओळख होती.”युवा मराठा”परिवाराचे ते सदैव हितचिंतक आश्रयदाते होते.त्यांच्या निधनाने कधी न भरुन येणारी पोकळी निर्माण झाली असल्याचे दुःख संवेदना संदेशात “युवा मराठा”परिवाराने म्हटले आहे.कै.आत्माराम रतन बोरसे यांच्या मृत्म्यांस ईश्वर चिरशांती देवो हि “युवा मराठा”परिवाराची भावपूर्ण श्रध्दांजली.