राजेंद्र पाटील राऊत
एप्रिल आणि मे महिन्यात देशात १ लाख ३८ हजार कोरोना मृत्यू
राजेश एन भांगे/ब्युरो चीफ युवा मराठा न्युज नेटवर्क
कोरोना विषाणूच्या संसर्गामुळे भारतात आतापर्यंत झालेल्या मृत्यूंचा आकडा तीन लाखांच्या वर गेला आहे.
देशातील सर्वच राज्य कोरोनाच्या दुसऱ्या लाटेच्या कचाट्यात सापडली आहेत.
फेब्रुवारी महिन्यात आरोग्य व्यवस्थेतील तज्ज्ञ आणि संशोधकांनी दुसऱ्या लाटेचा धोका निदर्शनास आणून दिला असतानाही ऑक्सिजन आणि औषधांचा पुरवठा कमी पडत गेल्याने देशात मृत्यूचा आकडा सातत्याने वाढत गेला.
५ एप्रिल २०२१ रोजी पहिल्यांदा देशातील दैनंदिन रुग्णांचा आकडा एक लाखावर गेला होता. त्या दिवशी देशातील एकूण मृत्यू होते १ लाख ६५ हजार १०१. त्या नंतर पुढच्या २५ दिवसांत म्हणजे च १ मे रोजी भारतातील दैनंदिन कोरोना रुग्णांचा आकडा पोहोचला होता ४ लाखांच्यावर आणि या दिवशी भारतातील एकूण मृत्यूंची संख्या होती २ लाख ११ हजार.
आज देशातील एकूण मृत्यूंचा आकडा ३ लाख ३ हजार ७२० वर पोहोचला आहे.
याचाच अर्थ मागच्या २४ दिवसांत देशात ९० हजार मृत्यू झाले आहेत.