Home नांदेड शेतकऱ्यांच्या एकजुटीचा अखेर विजय,खताची दरवाढ मागे

शेतकऱ्यांच्या एकजुटीचा अखेर विजय,खताची दरवाढ मागे

123
0

राजेंद्र पाटील राऊत

शेतकऱ्यांच्या एकजुटीचा अखेर विजय,खताची दरवाढ मागे
मुखेड तालुका प्रतिनिधी मनोज बिरादार ( युवा मराठा न्यूज नेटवर्क)
शेतकऱ्यांला उदवस्थ करणारी खतदरवाढ मा.पंतप्रधानांनी रद्द केली आहे.हा खरा शेतकरी एकजुटीचा विजय आहे.खतांचे दर गगनाला भिडले होते त्या दरवाढीबद्दल सर्वसामान्य नागरिक व शेतकऱ्यांमध्ये प्रचंड चिड होती.या खतदरवाढी विरोधात सोशल मीडियावर प्रचंड आवाज उठवल्यामुळे अखेर सरकारला यापुढे झुकावे लागले आणि सरकारने वाढीव खतांचे दर कमी केले आहेत.हा खरा शेतकऱ्यांचा विजय आहे.
भविष्यात सरकारने शेतकऱ्यांच्या बाबतीत निर्णय घेतांना विचारपूर्वक निर्णय घ्यावेत.कारण,आता शेतकऱ्यांच्या पोरांना धोरणं कळायला लागली,तो त्याविरुद्ध नव्या माध्यमातून व्यक्त व्हायला लागला.त्या विरुद्ध लढायची त्याची पूर्ण तयारी आहे.म्हणून
खताच्या वाढलेल्या किंमती रद्द करण्यात आल्या आहेत.खत कंपन्यांना वाढीव खतदराची पोती बाजारातून तात्काळ मागे घेण्याचा आदेश दिला पाहिजे व नवीन दराने खत विक्री करणाऱ्यावर कार्यवाही झाली पाहिजे,असे मत स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे जिल्हाध्यक्ष शिवशंकर पाटील कलंबरकर यांनी व्यक्त केले आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here