राजेंद्र पाटील राऊत
सटाणा -( शशिकांत पवार, युवा मराठा न्यूज नेटवर्क, सटाणा)- बागलाण तालुक्यात सलग तीन दिवसांपासून वादळी वाऱ्यासह पावसाने थैमान घातले असून नागरिक हैराण झाले आहेत तर ठीक ठिकाणी लाखो च नुकसान झाले आहे. काही ठिकाणी ज्या शेतकऱ्यांकडे कांदा साठवणुकीसाठी काहीही व्यवस्था नव्हती त्यांनी प्लास्टिक कागदाने शेतातच कांदे व मका झाकून ठेवले होते पण सोसाट्याच्या वादळामुळे प्लास्टिक कागद उडून गेल्यामुळे शेतातील कांदे व इतर पिकांचे भिजल्या ने लाखोंचे नुकसान झाले आहे तर काही ठिकाणी कांदा चाळी वरील पत्रे उडून नुकसान झाले आहे. तालुक्यातील पिंगळ वाडे येथील प्राथमिक आरोग्य उपकेंद्राच्या छतावरील पत्रे उडून मोठे नुकसान झाले आहे सुदैवाने कुठलीही जिवितहानी झाली नाही. ऐन कोरोनाच्या काळात आरोग्य उपकेंद्राचे झालेले नुकसान हा एक नागरिकांसाठी चिंतेचा विषय झाला आहे.