राजेंद्र पाटील राऊत
!!प्रथम वर्धापन दिनानिमिताने!!
सत्याच्या वाटेवर पत्रकारितेची अखंडीत वाटचाल….!
गेले ते कावळे,सोबत आहेतच मावळे!!
वाचकहो,
“युवा मराठा”आँनलाईन वेब न्युज चँनलची मुहूर्तमेढ रोवतानाच आम्ही एक पक्का निश्चय व निर्धार केला होता की,बहुजन समाजातल्या तळागाळातील बारा बलुतेदार ,अठरा पगड जातीधर्माला सोबत घेऊनच हि प्रबोधनाची लढाई व्यशस्वी करायची व त्यासाठी बरेपैकी यशदेखील लाभले.हे सर्व करीत असताना आम्ही कधी जातीभेद मानला नाही,”जे जे आपणांशी ठावे ते इतरांशी सांगावे,शहाणे करुन सोडावे सकळ जन” या संत वचनाप्रमाणे आम्ही या शब्दप्रवासात कार्यरत राहिलो आहोत.पत्रकारिता करताना आम्ही एक ध्येय व उद्देश मनामध्ये बाळगला होता की,अगदी तळागाळातल्या सामान्यातला सामान्य माणूस यालादेखील पत्रकारितेचे ज्ञान देऊन घडवायचे व तसा प्रामाणिकपणे प्रयत्न देखील आम्ही केला.मात्र लोकांचे जोडे उचलण्यातच आमचा जमाना गेला.आमची लायकी नसताना सुध्दा आम्ही दुसऱ्यांनाच लायकी मिळवून देण्यासाठी अक्षरशः नालायकी केली.मात्र गाढवाच्या अंगावर वाघाचे कातडे पांघरल्याने ते डरकाळी फोडत नसते,हे तरी त्या महामुर्खाना कधी कळणार?”युवा मराठा” या आमच्या पोटच्या मुलाप्रमाणे वाढवलेल्या अपत्यरुपी आँनलाईन वेब न्युज चँनलचा जन्म तुमच्या सर्वाच्या साक्षीनेच मागील वर्षी १७ मे २०२० रोजी झाला.आज प्रथम वर्धापन दिन!या आमच्या “युवा मराठा” रुपी अपत्यानेच इतरांना जगायला शिकविले,मान-सन्मान मिळवून दिला.इतकेच काय तर पोट भरण्याचे सुध्दा शिकविले.मात्र शिरजोर बनून मुजोर झालेल्या आणि आम्हीच मातवलेल्या काही हितशत्रूनी आणि भस्मासुरांनी “युवा मराठा”चे नेहमीच खंडन करण्याचा प्रयत्न केला आणि करीतच आहेत.मात्र आम्हांला आपल्या सारख्या सुजाण वाचक मायबाप वर्गाची साथ लाभली तर अशक्य असे ते काहीच नाही.”युवा मराठा”ने नेहमीच उपेक्षित गोरगरिबांची साथसंगत पुरविली,अन्यायाचा तिरस्कार भ्रष्टाचारावर प्रहार आणि लबाड खोटया भामटयांवर तीव्र घणाघती वार केला.म्हणून “युवा मराठा”सर्वसामान्यांचा जिव्हाळा बनून राहिला.मात्र काही आमच्याच बिरादरीतल्या नासलेल्या किडयांनी “युवा मराठा”ची प्रतिमा मलिन करण्याचा प्रयत्न केला.त्यामुळे भयानक अशा संकटाना सामोरे जाऊन आज पुन्हा तुमच्यासमोर आम्ही निर्भिडपणे उभे आहोत.सत्याच्या वाटेवर चालत असताना हा मिळालेला अनुभव आम्हांला खुप काही शिकवून गेला.वै-यांची दुश्मनी पावन करण्याची इथल्या संस्कृतीची रित आहे.दुश्मनांची बद्दुवा आम्हांला हमेशा प्रिय आहे.आमच्या जीवनात आम्ही कधी कुणाला दुःख दिले नाही किंवा कोणाचे वाईट केले नाही.सतत प्रत्येक जातीधर्माच्या दुःखीताला जवळ करुन त्याचा आधार होण्याचा प्रामाणिक प्रयत्न केला आहे.नारी जातीचा आम्ही आदरच करीत आलो आहोत.कारण आम्ही देखील एका स्त्रीच्याच पोटी जन्म घेतला आहे हे कधीच विसरत नाही.तरीही आमच्याच काही मित्र म्हणविणा-यां यारांनी आमच्या सुखी जीवनात मतभेद निर्माण करुन आम्हांला आयुष्यातून उठविण्याचे षडयंत्र रचले.पण त्यांचे हे मनसुबे कधीच व्यशस्वी होणार नाहीत.कारण पाप करुन जर का कोणी मोक्ष मिळविण्याची स्वप्ने पाहत असेल तर ते या जन्मी तरी अशक्य आहे.कारण पापाला माप नसते शेवटी हेच खरे!सभ्यतेचा बुरखा पांघरलेल्यांनी पांढरे कपडे घालून केलेले काळे धंदे,बडयांनी बोललेले धडधडीत असत्य व खोटे या दुनियेत आजकाल कौतुकास पात्र ठरत आहे.असत्येच्या मार्गावर चालणारे तव्यावर नोटा शेकत आहेत.लुच्चाईच्या या जमान्यात सच्चाईला खुलेआम लाथाडले जात आहे.आक्रस्थळी तथा उरबडवी आकांडतांडवी भाषा आम्हांला मंजूर नाही,आपूलकी,स्नेह,जिव्हाळा ,प्रेम या शिदोरीवरच आमची वाटचाल सुरु आहे.आम्ही माणसे जोडली.अनेकांना संसारात बसविले,कुणाचे घर मात्र फोडले नाही.ज्यांना ज्यांना आमचे म्हणून अतिविश्वासाने जवळ केले.अखेर मित्राच्या नावाला काळीमा लावणाऱ्या या भामटयांनी काय साध्य केले.?जीवन क्षणभंगूर असले तरी बेवकुफ,लबाड,बदमाशांच्या भलत्या सलत्या गोष्टींनी आम्ही हार मानायला आजही तयार नाहीत.कारण कोंबड कितीही मेल्याहून मेलेलं असलं म्हणून ते ओरडणे थोडचं थांबवत? मेलेलं कोंबडं कधी आगीला घाबरतं?याची जाणीव आमच्याच हितचिंतक हितशत्रूनी ठेवायला हवी.कारण केलेले पाप येथेच भरावे लागते.हे सत्य तरी कसे नाकारायचे? त्याशिवाय पितृपक्षातच फक्त कावळ्यांची आठवण होते नाही तरी ते इतरत्र वा-यावर उडून जातात.परंतु “युवा मराठा”ने घडविलेले पत्रकाररुपी मावळे आजही सोबतच आहेत व राहतील.शिवाय कावळे कधी घरात पाळण्याची पक्षी प्रेमासारखी गोष्ट नाही की कावळ्याला पोपटासारखे शिकवून हुशार करता येईल,शेवटी कावळा तो कावळाच कुणाच्या पिंडाला शिवला तर त्याला मान मिळतो.परंतु हाच कावळा पितृपक्षात नेमका गायब असतो.अशा भामटया कावळ्यांपासून “युवा मराठा” ने कुठली ती अपेक्षा बाळगायची?कारण “युवा मराठा” सततच सांगत आलाय…”एकटे नाहीत तुम्ही ,सोबत आहोत आम्ही सर्वाच्या सोबत सर्वासाठी प्रत्येक व्यक्ती आणि घरासाठी” हा स्विकारलेला मुलमंत्र “युवा मराठा” कधीच विसरणार नाही.आणि म्हणूनच “युवा मराठा”ची भरारी आज मुंबई ,पालघर,रायगड,नाशिक ,पुणे,कोल्हापूर , सोलापूर ,नांदेड,लातूर,वाशिमसह महाराष्ट्रभर आपला झंझावात वाढवितच आहे.!! त्याशिवाय मायबाप वाचकहो,आपल्याच आशिर्वादाने “युवा मराठा”ने आज रोजी संपूर्ण जगभरात एकूण १ लाख २० हजार ६ ४५ वाचक संख्येचा टप्पा व्यशस्वीरित्या ओलांडू शकलोत.आपणां सगळ्यांचे मनपुर्वक आभार!
राजेंद्र पाटील राऊत
मुख्य संपादक