Home माझं गाव माझं गा-हाणं अर्थसहाय योजनेतील लाभार्थ्यांना हयातीचे दाखले सादर करण्यासाठी मुदत वाढ

अर्थसहाय योजनेतील लाभार्थ्यांना हयातीचे दाखले सादर करण्यासाठी मुदत वाढ

141
0

राजेंद्र पाटील राऊत

 

अर्थसहाय योजनेतील लाभार्थ्यांना
हयातीचे दाखले सादर करण्यासाठी मुदत वाढ

: तहसिलदार चंद्रजित राजपूत

मालेगाव, दि. : १६( भैय्यासाहेब अहिरे प्रतिनिधी युवा मराठा न्युज नेटवर्क)- तहसिल कार्यालय, मालेगाव ग्रामिण कार्यक्षेत्रातील विशेष सहाय योजनेतील लाभार्थी यांना हयातीचे दाखले सादर करण्यासाठी मार्च 2021 पर्यंत मुदत शासन तरतुदीच्या अनुषंगाने देण्यात आली होती. आता दिनांक 3 मे 2021 रोजीच्या शासन निर्णयानुसार विशेष अर्थसहाय योजनेतील लाभार्थ्यांना हयातीचे प्रमाणपत्र सादर करण्याचा कालावधी वाढविण्यात आला असून हयातीचे दाखले व उत्पन्नाचे दाखले ज्या लाभार्थ्यांनी सादर केले नाहीत त्यांना 30 जून, 2021 पर्यंत मुदतवाढ देण्यात आल्याचे तहसिलदार चंद्रजित राजपूत यांनी शासकीय प्रसिध्दी पत्रकान्वये कळविले आहे.

संजय गाधी, श्रावणबाळ, वृध्दापकाळ, अपंग व विधवा या योजनेच्या लाभार्थ्यांनी यापूर्वी हयातीचे प्रमाणपत्र सादर केले असल्यास अशा लाभार्थ्यांनी पुन्हा हयातीचे प्रमाणपत्र देण्याची आवश्यकता नाही, तर ज्यांनी अजून हयातीचे दाखल्यासह उत्पन्नाचे दाखले सादर केले नाहीत त्यांनी संबंधित गावच्या तलाठीकडे विहीत मुदतीत सादर करावेत. मुदतवाढ दिलेल्या कालावधीत प्रमाणपत्र सादर न केलेल्या लाभार्थ्यांचे माहे जुलै 2021 पासून अर्थसहाय बंद करण्यात येईल यांची सर्व संबंधितांनी नोंद घेण्याचे अवाहनही तहसिलदार श्री. राजपूत यांनी शासकीय प्रसिध्दी पत्रकान्वये केले आहे.

Previous articleवाखारी व ग्रामीण परीसरात आखाजी चा सणाचा उत्साह दिसलाच नाही कोरोणाचा परिणाम
Next article!!प्रथम वर्धापन दिनानिमिताने!! सत्याच्या वाटेवर पत्रकारितेची अखंडीत वाटचाल….! गेले ते कावळे,सोबत आहेतच मावळे!!
युवा मराठा न्यूजपेपर्स आणि वेब पोर्टलवर प्रसिद्ध झालेल्या बातम्या व लेखांशी संपादक, मालक प्रकाशक  / अथवा मुद्रक सहमत असतीलच असे नाही. बातमी, लेख व जाहिरातीतील मजकूराची वैधता तपासून पाहू शकत नाही. बातमी, लेख व जाहिरातीतून उद्भवणाऱ्या कोणत्याही विषयाला युवा मराठा न्यूज जबाबदार नसून, संबंधित वार्ताहर, लेखक किंवा जाहिरातदारच आहे. युवा मराठा आँनलाईन वेब न्युज पोर्टल कुठलीही जबाबदारी घेत नाही. शिवाय वादविवाद हे मालेगांव, जि.नाशिक न्यायालयाअंतर्गतच चालविले जातील. भारत सरकारने फेब्रुवारी 2021 पासून अधिसूचित केलेल्या नव्या माहिती तंत्रज्ञान (मध्यस्थ मार्गदर्शक सूचना आणि डिजिटल माध्यमांसाठीची आचार संहिता) नियम 2021 अंतर्गत असलेल्या डिजिटल माध्यमांसाठीच्या आचार संहितेचे आम्ही पालन करतो. तरीही एखाद्या बातमीविषयी आपली तक्रार असल्यास आमच्या वेब माध्यमचे तक्रार निवारण अधिकारी आणि स्वनियमन संस्थेकडे विहित नमुन्यात अर्ज करू शकता. आपल्या तक्रारीचे निराकरण केले जाईल.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here