Home नांदेड वीज कोसळून संकटात सापडलेल्या कुटुंबाला रामदास पाटील सुमठाणकर मित्र परिवाराकडून मदत

वीज कोसळून संकटात सापडलेल्या कुटुंबाला रामदास पाटील सुमठाणकर मित्र परिवाराकडून मदत

117
0

राजेंद्र पाटील राऊत

वीज कोसळून संकटात सापडलेल्या कुटुंबाला रामदास पाटील सुमठाणकर मित्र परिवाराकडून मदत
संग्राम पाटील तांदळीकर
मुखेड तालुका शहर प्रतिनिधी

मुखेड तालुक्यामध्ये गेली दहा दिवस झाले तापमान ४० – ४१ अंश दुपारपर्यंत असून मात्र सायंकाळी अचानक ढगांचा गडगडाट होऊन पाऊस पडत असून काही ठिकाणी विज कोसळल्याची घटना घडली यामध्ये मौ.तग्याळ येथील शेतकरी गोविंद विठ्ठल भिंगोले यांच्या घरावर वीज कोसळून संपूर्ण घर जळून खाक झाल्याची दुर्दैवी घटना काल घडली.अगोदरच अत्यंत गरीब असलेले हे कुटुंब,या संकटामुळे आज रस्त्यावर आले आहे.आज,संकटात असलेल्या या कुटुंबाला रामदास पाटील सुमठाणकर मित्र परिवाराकडून भांडे,कपडे,धान्य या रूपाने मदतीचा आधार देण्यात आला.जवळ असलेले सर्व जळून खाक झाले.आज,अंगावरील कापड्याशिवाय या कुटुंबाजवळ काहीही नाही.ही मदत म्हणजे,एक आधार आहे.
यावेळी शिवशंकर पाटील कलंबरकर,विनोद आपटे,राम सावळेश्वर,तग्याळचे सरपंच बालाजी पाटील गोपनर,विलास पाटील तग्याळकर,कुटूंब प्रमुख गोविंद विठ्ठल भिंगोले,दिपक गुमडे,पत्रकार संजय राचलवार,बालाजी घंटेलवाड,चंद्रकांत गुमडे,बालाजी उप्पे,विनायक भिंगोले,बालाजी भिकनर आदी
या घटनेचा महसूल विभागाकडून पंचनामा केला आहे.यात 2 लाख रुपयांचे नुकसान झाले आहे.प्रशासनाने या कुटुंबाला तात्काळ नूकसानीची भरपाई दिली पाहिजे..या कुटुंबाला मदत मिळेप्रयन्त पाठपुरावा करू असे रामदास पाटील सुमठाणकर मित्र परिवाराकडून करण्यात आले

Previous articleगोकुळ दूध संघासाठी आज जिल्ह्यातील ठरावधारकांचे चुरशीनं मतदान
Next articleकोरोना काळात मदतीचा हात ; जिल्हाध्यक्षांचा वाढदिवस विविध उपक्रमांनी साजरा. ———————————- मराठा सेवासंघ संभाजी ब्रिगेडचे जिल्हाध्यक्ष बालाजी पाटील जाधव यांचा वाढदिवस विविध उपक्रमांनी साजरा.
युवा मराठा न्यूजपेपर्स आणि वेब पोर्टलवर प्रसिद्ध झालेल्या बातम्या व लेखांशी संपादक, मालक प्रकाशक  / अथवा मुद्रक सहमत असतीलच असे नाही. बातमी, लेख व जाहिरातीतील मजकूराची वैधता तपासून पाहू शकत नाही. बातमी, लेख व जाहिरातीतून उद्भवणाऱ्या कोणत्याही विषयाला युवा मराठा न्यूज जबाबदार नसून, संबंधित वार्ताहर, लेखक किंवा जाहिरातदारच आहे. युवा मराठा आँनलाईन वेब न्युज पोर्टल कुठलीही जबाबदारी घेत नाही. शिवाय वादविवाद हे मालेगांव, जि.नाशिक न्यायालयाअंतर्गतच चालविले जातील. भारत सरकारने फेब्रुवारी 2021 पासून अधिसूचित केलेल्या नव्या माहिती तंत्रज्ञान (मध्यस्थ मार्गदर्शक सूचना आणि डिजिटल माध्यमांसाठीची आचार संहिता) नियम 2021 अंतर्गत असलेल्या डिजिटल माध्यमांसाठीच्या आचार संहितेचे आम्ही पालन करतो. तरीही एखाद्या बातमीविषयी आपली तक्रार असल्यास आमच्या वेब माध्यमचे तक्रार निवारण अधिकारी आणि स्वनियमन संस्थेकडे विहित नमुन्यात अर्ज करू शकता. आपल्या तक्रारीचे निराकरण केले जाईल.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here