राजेंद्र पाटील राऊत
मुखेड तालुक्यातील तांदळी येथे शेतातील घरास आग लागून गृहपयोगी वस्तू, रोख रक्कम जळून खाक..
मुखेड तालुका प्रतिनिधी मनोज बिरादार (युवा मराठा न्यूज नेटवर्क)
मुखेड तालुक्यातील मौजे तांदळी येथील माधव शंकर जाधव रा. तांदळी यांच्या शेतातील पत्राच्या घरास राहात होते .दिनांक 25 एप्रिल रोजी पहाटे पाच वाजेच्या सुमारास अचानक घरास आग लागली. या आगीत संपूर्ण घरच पेट घेतल्याने घरातील सर्व साहित्य जळून खाक झाले. अचानक आग लागून घरातील संसार उपयोगी साहित्य जळून खाक झाले त्यात सर्व जीवनावश्यक वस्तू ज्वारी 10 पोते, गहू 5 पोते, तुर 5 पोते, मुग 2 पोते, डाळ व तांदूळ 2 पोते, वापरण्याचे कपडे , अद्रक बेणे, दागदागिने व हळद विकून दोन लाख रुपये आलेले डब्यात ठेवले होते. हे संपूर्ण जळून खाक झाले. व तसेच कांदा विकलेले तीस हजार रुपये असे एकूण दोन लाख 30 हजार रुपये जळून खाक होऊन शेतकऱ्याचे मोठे नुकसान झाले. तसेच पॅशन प्रो हिरो कंपनीची मोटरसायकल अर्धवट जळाली. अशा प्रकारे मोठे नुकसान होऊन कुटुंब बेघर होऊन उघड्यावर आले. आगीचे कारण अद्याप समजू शकले नाही.होकर्णा सज्जाचे तलाठी श्री ए. एन. करटे यांनी घटनास्थळी भेट देऊन रीतसर पंचनामा केला. मात्र पहाटे पाच वाजेच्या दरम्यान घरास अचानक आग लागली. ही घटना शेजाऱ्यांना व गावकऱ्यांना समजताच त्यांनी आग विझविण्याचा आटोकाट प्रयत्न केला. मात्र संपूर्ण घरच पेटल्याने आग विझविण्यासाठी बराच वेळ लागला. त्यात संसारोपयोगी साहित्य, रोख रक्कम, धान्य जळून खाक झाल्याने निवारा गेला. त्यामुळे राहण्याचा व खाण्याचा प्रश्न निर्माण झाल्याने आर्थिक संकटात ते सापडले आहेत. आर्थिक संकटात सापडलेल्या शेतकऱ्यास प्रशासनाने तात्काळ मदत जाहीर करून सहकार्य करावे अशी मागणी ग्रामस्थांतून होत आहे.