राजेंद्र पाटील राऊत
व-हाणेत कांदाचाळीवर अज्ञात समाजकंटकाने युरीया फेकल्याने लाखो रुपयांचे नुकसानीची भिती…
मालेगांव,(युवा मराठा न्युज नेटवर्क) नाशिकच्या मालेगांव जवळील व-हाणे गावी अज्ञात समाजकंटकाने एका शेतकऱ्यांच्या साठवून ठेवलेल्या कांदा चाळीवर युरीया नामक रसायन फेकल्याने लाखो रुपये किमतीचा कांदा सडून नाश पावण्याची भिती व्यक्त केली जात आहे.
याबाबत प्राप्त माहिती अशी की,व-हाणे येथील शेतकरी सुभाष कौतीक वाघ व चंद्रकांत कौतीक वाघ या शेतकऱ्यानी कांद्याला चांगला भाव मिळेल या अपेक्षेने लाखो रुपयाचा कांदा हा चाळीत साठवून ठेवलेला होता.मात्र कुणी तरी अज्ञात हितशत्रुने साठविलेल्या या कांदा चाळीवर युरिया नामक रसायन टाकून दिल्याने संपूर्ण कांदा सडून नष्ट होण्याची दाट शक्यता निर्माण झाली आहे.अगोदरच कोरोना महामारी संकटाने मेटाकुटीस आलेला शेतकरी वर्ग या अशा भयानक प्रकारामुळे हतबल झाला आहे.दरम्यान घटनास्थळावर पोलिस दाखल झाल्याची माहिती मिळत असून,नुकसानग्रस्त शेतकरी सुभाष वाघ व चंद्रकांत वाघ यांना शासनाने नुकसान भरपाई देऊन गुन्हेगारावर कारवाईची मागणी पुढे येत आहे.