Home कोल्हापूर पन्हाळा तालुक्यात आई-वडीलांची मुलासह नदीत उडी घेऊन आत्महत्या

पन्हाळा तालुक्यात आई-वडीलांची मुलासह नदीत उडी घेऊन आत्महत्या

82
0

राजेंद्र पाटील राऊत

पन्हाळा तालुक्यात आई-वडीलांची मुलासह नदीत उडी घेऊन आत्महत्या

नवे पारगाव प्रतिनिधी : गोठे तालुका पन्हाळा येथील पती पत्नीने आपल्या लहान मुलासह सामुहिक आत्महत्या केल्याचं समोर आलं आहे. पन्हाळा तालुक्यातील कुंभी नदीपात्रात तिघांचे मृतदेह सापडले असून आई-वडिलांनी आपल्या सहा वर्षाच्या मुलाला दोघांच्यामध्ये दोरीने बांधून कुंभी नदीत उडी घेऊन आत्महत्या केली.
गोठे गावातील दीपक शंकर पाटील वय ४०, वैशाली दीपक पाटील वय ३५ यांनी आपला १४ वर्षाचा मुलगा विघ्नेश याला आपल्याबरोबरच हाताला दोरीने बांधून घेऊन कुंभी नदीच्या पात्रात उडी टाकून आत्महत्या केली. ही घटना उघड होताच संपूर्ण गाव नदीत पात्राकडे धावला. गोठे गावात आपले वडील, पत्नी आणि दोन मुले यासह राहत असलेले दीपक पाटील हे शेती व्यवसाय करीत होते. या बरोबरच जोडधंदा म्हणून दुधाचा व्यवसाय करीत होते. घरी खाऊन पिऊन सुखी असलेल्या या कुटुंबाच्या आत्महत्येने संपूर्ण कळे परिसर हळहळला. त्यांची १६ वर्षाची मुलगी मामाच्या गावी गेल्यामुळे या घटनेतून सुखरूप आहे.
दीपक पाटील यांनी आत्महत्ये करणेपूर्वी घरात सुसाईड नोट लिहून ठेवली आहे .यामध्ये जीवनात अयशस्वी झालो आहे. आत्महत्यास कोणालाही जबाबदार धरुनये. माझ्या वडिलांना आणि मुलीला सांभाळा असा मजकूर लिहिला आहे. याबाबतची वर्दी कळे पोलीस ठाण्यात मिळाल्यानंतर पोलिसांनी घटनास्थळी येऊन घटनेचा पंचनामा केला. घटनास्थळी पोलीस उपअधीक्षक आर.आर.पाटील सपोनि प्रमोद सुर्वे यांच्यासह येवून तपासाबाबत सूचना दिल्या. मात्र नेमकं आत्महत्येचं नेमके कारण अद्याप समजू शकले नाही.(युवा मराठा न्युज नेटवर्क)

Previous articleअध्यक्षपदी माजी आ. वसंतराव चव्हाण यांची निवड होताच बेटमोगरऱ्यात विजयाच्या जल्लोष…
Next articleरूग्ण संख्येनुसार बेड वाढलेच पाहिजेत, 24 तासांत रिपोर्ट यायलाच हवा. 
युवा मराठा न्यूजपेपर्स आणि वेब पोर्टलवर प्रसिद्ध झालेल्या बातम्या व लेखांशी संपादक, मालक प्रकाशक  / अथवा मुद्रक सहमत असतीलच असे नाही. बातमी, लेख व जाहिरातीतील मजकूराची वैधता तपासून पाहू शकत नाही. बातमी, लेख व जाहिरातीतून उद्भवणाऱ्या कोणत्याही विषयाला युवा मराठा न्यूज जबाबदार नसून, संबंधित वार्ताहर, लेखक किंवा जाहिरातदारच आहे. युवा मराठा आँनलाईन वेब न्युज पोर्टल कुठलीही जबाबदारी घेत नाही. शिवाय वादविवाद हे मालेगांव, जि.नाशिक न्यायालयाअंतर्गतच चालविले जातील. भारत सरकारने फेब्रुवारी 2021 पासून अधिसूचित केलेल्या नव्या माहिती तंत्रज्ञान (मध्यस्थ मार्गदर्शक सूचना आणि डिजिटल माध्यमांसाठीची आचार संहिता) नियम 2021 अंतर्गत असलेल्या डिजिटल माध्यमांसाठीच्या आचार संहितेचे आम्ही पालन करतो. तरीही एखाद्या बातमीविषयी आपली तक्रार असल्यास आमच्या वेब माध्यमचे तक्रार निवारण अधिकारी आणि स्वनियमन संस्थेकडे विहित नमुन्यात अर्ज करू शकता. आपल्या तक्रारीचे निराकरण केले जाईल.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here