राजेंद्र पाटील राऊत
पुणे 10 मार्च ⭕युवा मराठा न्यूज प्रतिनिधी सिद्धांत चौधरी⭕
पुणे आळंदी : आळंदीत कॅमेरे सुरक्षिततेसाठी का फक्त दिसण्यासाठी ?
श्रीक्षेत्र अलंकापुरी जर काही घटना घडल्या त्याठिकाणी प्रूफ जर तपासायचं म्हटलं तर आपल्या इथं कॅमेरे खूप लागलेत परंतु कुठलाही कॅमेऱ्याला डिस्प्ले आहे किंवा नाही हेच माहीत नाही शिवाय ते कॅमेरे बंदच आहेत अहो आज अलंकापुरी मध्ये येणारे भाविक येतात उद्या जर काही अघटित घटना घडल्यात पण पुढे होऊ नये यासाठी जर एखाद्या वेळेस झालेल्या घटनेचे फुटेज बघायचे झाले तर सीसीटीव्ही पण या सीसीटीव्ही ला बुरशी चढली ती बुरशी कधी निघणार आळंदीचा विकास खूप मोठा होत चालला आहे परंतु याची दक्षता घेतली जात नाही ही फार मोठी शोकांतिका
इंद्रायणी नदीला धोबीघाटाचे स्वरुप निर्माण झाले शिवाय जेव्हा जे कपडे खराब झाले तेही नदीत सोडतात त्यामानाने आपण सुक्षित लोक आहोत आपण असे न वागता योग्य कपडे धुवा पण खराब कपडे नदीत टाकणे नेमके कोणते शोभनीय दर्शन घडवले मानवतेला शोभनीय बाब नाही त्या ठिकाणी अनेक धार्मिक कार्यक्रम होतात तेथील केलेल्या विधीचे साहीत्य उचलणे हे ही मानवतेचे लक्षण आहे तेव्हा आपल्या जी बाब योग्य वाटती ती आपणहून स्वतः केली तरच इतर लोकही घाट स्वच्छ ठेवतील आपलीच नदी आपणच स्वच्छ ठेवली पाहीजे अंलकापुरीतील अनेक ज्ञानी लोक आहेत येथूनच ज्ञानाची गंगा वाहते मग तरिही आपण चुकिचे वागणे हे शोभनीय नाही ना!