Home राजकीय पवार झारखंडच्या दौऱ्यावर, धोनीच्या नावावर पार्टी मजबूत करण्याचा प्रयत्न.? पाहा काय म्हणाले...

पवार झारखंडच्या दौऱ्यावर, धोनीच्या नावावर पार्टी मजबूत करण्याचा प्रयत्न.? पाहा काय म्हणाले पवार?🛑

98
0

राजेंद्र पाटील राऊत

🛑 पवार झारखंडच्या दौऱ्यावर, धोनीच्या नावावर पार्टी मजबूत करण्याचा प्रयत्न.? पाहा काय म्हणाले पवार?🛑
✍️ झारखंड 🙁 विजय पवार महाराष्ट्र प्रतिनिधी युवा मराठा न्युज )

झारखंड :⭕राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार, झारखंड दौऱ्यावर आहेत.

भाजपच्या सत्ताकाळात काँग्रेस पक्षाचं संघटन कमकुवत होतं चाललंय अशा परिस्थितीत 81 व्या वर्षी गैर भाजप मतदारांना एका नवा पर्याय देण्यासाठी शरद पवार प्रयत्नशील आहेत. आज झारखंडमध्ये राज्यस्तरीय कार्यकर्त्यांना शरद पवार यांनी संबोधित केलं.

यावेळी त्यांनी झारखंडचा लोकल बॉय तथा भारताचा माजी कर्णधार महेंद्रसिंह धोनीवर स्तुतीसुमने उधळली.

“राहुल द्रविडने ज्यावेळी राजीनामा देण्याचा निर्णय घेतला त्यावेळी देशासमोर पुढचा कर्णधार कोण, असा यक्ष प्रश्न उभा ठाकला. त्यानंतर झारखंडचा एक मुलगा, महेंद्रसिंग धोनी त्याचं नाव… सचिन तेंडुलकरने त्याच्या नावाची शिफारस केली आणि पुढे भारतीय क्रिकेट जगभरात लोकप्रिय होण्यासाठी धोनीने कष्ट घेतले”, अशी स्तुती शरद पवार यांनी केली.

*शरद पवार नेमके काय म्हणाले…?*

“भारतीय क्रिकेटमध्ये मोठे योगदान देणाऱ्या खेळाडूंमध्ये माजी कर्णधार महेंद्रसिंग धोनीचं नाव अग्रक्रमाने घ्यावं लागेल. भारताच्या इंग्लंड दौर्‍यादरम्यान राहुल द्रविडने मला सांगितले की कर्णधारपदाचा त्याच्या खेळावर परिणाम होत आहे आणि त्याला द्यायचा आहे. यानंतर मी सचिन तेंडुलकरला पदभार स्वीकारण्यास सांगितला पण त्यानेही नकार दिला.”
“त्यानंतर मी सचिनला विचारलं की संघाचं नेतृत्व कोण करणार? त्यावेळी त्याने धोनीच्या नावाची शिफारस केली. तो म्हणाला “आपल्याकडे एक खेळाडू आहे जो भारतीय क्रिकेट जगभरात लोकप्रिय करू शकतो आणि त्यानंतर धोनीला ही जबाबदारी देण्यात आली, ज्याच्या नेतृत्वात भारतीय क्रिकेटला जगभरात लोकप्रियता मिळाली. एक अढळ स्थान मिळालं, असं शरद पवार म्हणाले.”

“देशभरात प्रेम, बंधुभाव, वाढेल किंवा तसं वातावरण निर्माण करायची केंद्राची जबाबदारी असते. केंद्रात सत्ते असलेलं भाजप देशात जातीय विष पसरवत आहे. शेतकरी गेल्या 100 दिवसांपासून दिल्लीच्या सीमेवर बसला आहे. आपल्या हक्कांसाठी तो लढतो आहे पण केंद्रातील सरकार त्यांचं म्हणणं ऐकून घ्यायला तयार नाही. दिवसांपासून निषेध करीत आहेत, पंतप्रधानांना कोलकात्याला जाण्यासाठी वेळ आहे. तिथल्या पश्चिम बंगाल सरकारच्या विरोधात मोर्चा काढायला वेळ आहे पण इथे दिल्लीतल्या मोर्चेकरी शेतकऱ्यांना भेटायला वेळ नाही”, असा हल्लाबोल शरद पवार यांनी केला.⭕

Previous articleगजा मारणेची अभिनव देशमुखांनी केली थेट येरवड्यात रवानगी🛑
Next articleनायगाव तालुक्यातील बेटक बिलोली येथे अंगणवाडी खाऊचे रिकामी पाकीट सापडल्याने बालविकास अधिकाऱ्यांनी केला पंचनामा     
युवा मराठा न्यूजपेपर्स आणि वेब पोर्टलवर प्रसिद्ध झालेल्या बातम्या व लेखांशी संपादक, मालक प्रकाशक  / अथवा मुद्रक सहमत असतीलच असे नाही. बातमी, लेख व जाहिरातीतील मजकूराची वैधता तपासून पाहू शकत नाही. बातमी, लेख व जाहिरातीतून उद्भवणाऱ्या कोणत्याही विषयाला युवा मराठा न्यूज जबाबदार नसून, संबंधित वार्ताहर, लेखक किंवा जाहिरातदारच आहे. युवा मराठा आँनलाईन वेब न्युज पोर्टल कुठलीही जबाबदारी घेत नाही. शिवाय वादविवाद हे मालेगांव, जि.नाशिक न्यायालयाअंतर्गतच चालविले जातील. भारत सरकारने फेब्रुवारी 2021 पासून अधिसूचित केलेल्या नव्या माहिती तंत्रज्ञान (मध्यस्थ मार्गदर्शक सूचना आणि डिजिटल माध्यमांसाठीची आचार संहिता) नियम 2021 अंतर्गत असलेल्या डिजिटल माध्यमांसाठीच्या आचार संहितेचे आम्ही पालन करतो. तरीही एखाद्या बातमीविषयी आपली तक्रार असल्यास आमच्या वेब माध्यमचे तक्रार निवारण अधिकारी आणि स्वनियमन संस्थेकडे विहित नमुन्यात अर्ज करू शकता. आपल्या तक्रारीचे निराकरण केले जाईल.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here