राजेंद्र पाटील राऊत
महाराष्ट्रात पुन्हा लाँकडाऊन लागणार?मुख्यमंत्री उध्दव ठाकरे साधणार जनतेशी संवाद!
(विजय पवार महाराष्ट्र प्रतिनिधी युवा मराठा न्युज नेटवर्क)
मुंबई -महाराष्ट्र राज्यात सध्या कोरोना रुग्णांचे प्रमाण वाढत चालल्याने चितेंची बाब म्हणून प्रशासनापुढे उभी ठाकली आहे.
कोरोना व्हायरस पासून बचावासाठी मास्क लावणे,सँनिटाँयझरचा वापर करणे हे जितके महत्त्वाचे आहे,तेवढेच नागरिकांमध्ये जागृती निर्माण होणे गरजेचे आहे.सामाजिक सुरक्षितता म्हणून अंतर ठेवावे.गर्दीमध्ये जाणे टाळावे अशा सुचना प्रशासनाकडून देण्यात आलेल्या असल्या,तरी आज रविवारी सायंकाळी ७ वाजता महाराष्ट्राचे मुख्यमंत्री उध्दव ठाकरे जनतेशी संवाद साधणार असुन लाँकडाऊन बाबत नेमका काय निर्णय होणार याकडे व इतरही घोषणाकडे जनतेचे लक्ष लागले आहे.