Home कोल्हापूर कोल्हापूर जिल्ह्यातील   ६ गावांच्या सरपंच पदाच्या निवडीला स्थगिती

कोल्हापूर जिल्ह्यातील   ६ गावांच्या सरपंच पदाच्या निवडीला स्थगिती

86
0

राजेंद्र पाटील राऊत

कोल्हापूर जिल्ह्यातील   ६ गावांच्या सरपंच पदाच्या निवडीला स्थगिती

कोल्हापूर जिल्ह्यातील सहा गावांच्या सरपंच पदाच्या निवडीला न्यायालयाने स्थगिती देण्यात आली आहे. कोल्हापूरसह पाच जिल्ह्यांतील ३१ गावांच्या सरपंच आरक्षणाला न्यायालयात आव्हान दिले होते. त्यावर शुक्रवारी उच्च न्यायालयात एकत्रित सुनावणी झाली. या प्रकरणी मंगळवारी (दि. ९) याचिकाकर्त्यांची सुनावणी घेण्याचे आदेश उच्च न्यायालयाने जिल्हाधिकार्‍यांना दिले. याबाबतचा निर्णय १६ फेब्रुवारीपूर्वी घ्यावा, असेही या आदेशात स्पष्ट केले आहे.
कोगे (ता. करवीर) येथील विश्वास पाटील, शिरटी व मजरेवाडी (ता. शिरोळ) येथील अनुक्रमे रामदास भंडारे व किशोर जुगळे आणि उंड्री (ता. पन्हाळा) येथील अजित खोत यांनी सरपंच आरक्षणविरोधात उच्च न्यायालायत धाव घेतली.
त्यांच्यासह फणसवाडी (ता. भुदरगड) आणि खुपीरे (ता. करवीर) सरपंचपदाच्या आरक्षणाविरोधातही याचिका दाखल करण्यात आली होती. कोल्हापूर जिल्ह्यासह सांगली, सातारा, सोलापूर आणि नाशिक या जिल्ह्यातील एकूण ३१ ग्रामपंचायतींच्या आरक्षण सोडतीवर आक्षेप घेण्यात आला होता.
या सर्व प्रकरणांची आज उच्च न्यायालयात न्यायमूर्ती विनय जोशी व एस. जे. खट्टवाला यांच्या खंडपीठासमोर एकत्रित सुनावणी झाली. या प्रकरणी जिल्हाधिकार्‍यांनी ९ फेब्रुवारी रोजी सकाळी ११ वाजता सुनावणी घ्या. त्यासाठी संबंधितांना स्वतंत्र नोटीस पाठविण्याची आवश्यकता नाही. संबंधित याचिकाकर्ते सकाळी ११वाजता उपस्थित राहतील, त्यांची सुनावणी घ्या, असे न्यायालयाने सांगितले.
याचिकाकर्त्यांना लेखी म्हणणेही मांडता येईल. ८ते ११फेब्रुवारी या कालावधीत निवडणूक कार्यक्रम घ्या, ही सर्व प्रक्रिया १६ फेब्रुवारीच्या पुढे जाणार नाही, असे स्पष्ट करत न्यायालयाने ही याचिका रद्द केली.

युवा मराठा न्युज नेटवर्क .

Previous articleजगद्गुरु श्री संत तुकोबाराय यांच्या जन्मोत्सवानिमित्त मौजे केरूर येथे अखंड हरिनाम सप्ताहाचे आयोजन..
Next articleरेशेनकार्ड श्वेत होणार बंद नाही
युवा मराठा न्यूजपेपर्स आणि वेब पोर्टलवर प्रसिद्ध झालेल्या बातम्या व लेखांशी संपादक, मालक प्रकाशक  / अथवा मुद्रक सहमत असतीलच असे नाही. बातमी, लेख व जाहिरातीतील मजकूराची वैधता तपासून पाहू शकत नाही. बातमी, लेख व जाहिरातीतून उद्भवणाऱ्या कोणत्याही विषयाला युवा मराठा न्यूज जबाबदार नसून, संबंधित वार्ताहर, लेखक किंवा जाहिरातदारच आहे. युवा मराठा आँनलाईन वेब न्युज पोर्टल कुठलीही जबाबदारी घेत नाही. शिवाय वादविवाद हे मालेगांव, जि.नाशिक न्यायालयाअंतर्गतच चालविले जातील. भारत सरकारने फेब्रुवारी 2021 पासून अधिसूचित केलेल्या नव्या माहिती तंत्रज्ञान (मध्यस्थ मार्गदर्शक सूचना आणि डिजिटल माध्यमांसाठीची आचार संहिता) नियम 2021 अंतर्गत असलेल्या डिजिटल माध्यमांसाठीच्या आचार संहितेचे आम्ही पालन करतो. तरीही एखाद्या बातमीविषयी आपली तक्रार असल्यास आमच्या वेब माध्यमचे तक्रार निवारण अधिकारी आणि स्वनियमन संस्थेकडे विहित नमुन्यात अर्ज करू शकता. आपल्या तक्रारीचे निराकरण केले जाईल.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here