Home पश्चिम महाराष्ट्र निवडणूक प्रक्रियेवर बहिष्कार टाकू , अकलूज ग्रामस्थांचा इशारा

निवडणूक प्रक्रियेवर बहिष्कार टाकू , अकलूज ग्रामस्थांचा इशारा

91
0

राजेंद्र पाटील राऊत

निवडणूक प्रक्रियेवर बहिष्कार टाकू , अकलूज ग्रामस्थांचा इशारा

सोलापूर जिल्ह्यातील अकलूज (ता.माळशिरस ) ही आशिया खंडातील सर्वात मोठी ग्रामपंचायतअसलेल्या अकलूज ग्रामपंचायतीचा नगरपंचायत आणि नगरपालिकेमध्ये रूपांतर होण्याचा प्रस्ताव अंतिम टप्प्यात असताना , त्यातच येथील ग्रामपंचायतीची निवडणूक जाहीर झालीय. सोबतच नातेपुते महाळुंग श्रीपूर ग्रामपंचायतीचा नगरपंचायत होण्याचा प्रस्ताव अशाच पद्धतीने अंतिम टप्प्यात रखडलेला आहे.
शासनाने तात्काळ ग्रामपंचायतीचे रूपांतर नगरपालिका आणि नगरपंचायतीमध्ये करावे अन्यथा निवडणूक प्रक्रियेवर बहिष्कार टाकू, असा इशारा अकलूज येथील ग्रामस्थांनी दिलाय.
आज अकलूज येथे व्यापारी तसेच ग्रामस्थांची एक बैठक झाली आणि या बैठकीमध्ये सुरू असलेल्या ग्रामपंचायत निवडणूक प्रक्रियेवर बहिष्कार टाकण्याचा निर्णय एकमताने घेण्यात आला. माळशिरस तालुक्यातील अकलूज नातेपुते तसेच महाळुंग श्रीपूर माळीनगर येथील वाढती लोकसंख्या पाहता सध्या अस्तित्वात असणाऱ्या ग्रामपंचायती ग्रामस्थांना नागरी सुविधा देण्यास अपुर्‍या पडत असल्याने येथील ग्रामपंचायतीचे रूपांतर नगरपंचायतीमध्ये करावे, असा प्रस्ताव शासन स्तरावर दाखल केला होता. सप्टेंबर २०१९ मध्ये त्या पद्धतीचा आदेश आधीसुद्धा शासन स्तरावर काढण्यात आलेला आहे.
सध्या या ग्रामपंचायतीचे रूपांतर नगरपंचायतीमध्ये होण्याचा अंतिम निर्णय अपेक्षित आहे, असे असतानाच राज्य सरकारकडून निवडणूक आयोगाला या ग्रामपंचायतीच्या निवडणुकांबाबत विनंतीपत्र दिलेलं होतं. कोणताही विचार न करता प्रक्रिया सुरू झालेली आहे. दोन दोन वेळा निवडणुकांना सामोरं जाणं उमेदवारांना आणि मतदारांना प्रशासनाला अवघड जाईल. यामुळे या ग्रामपंचायतीचे नगरपंचायतीमध्ये रूपांतर करूनच येथील निवडणूक प्रक्रिया पार पाडावी अन्यथा ग्रामपंचायतीच्या निवडणूक प्रक्रियेवर बहिष्कार टाकू, असा इशारा ग्रामस्थांनी दिलाय.

युवा मराठा न्यूज नेटवर्क .

Previous articleमंत्री रामदास आठवले यांनी ईडीच्या नोटीसीवर भन्नाट केली कविता 
Next articleभाजपच्या टिकेला काँग्रेसचं प्रतिउत्तर
युवा मराठा न्यूजपेपर्स आणि वेब पोर्टलवर प्रसिद्ध झालेल्या बातम्या व लेखांशी संपादक, मालक प्रकाशक  / अथवा मुद्रक सहमत असतीलच असे नाही. बातमी, लेख व जाहिरातीतील मजकूराची वैधता तपासून पाहू शकत नाही. बातमी, लेख व जाहिरातीतून उद्भवणाऱ्या कोणत्याही विषयाला युवा मराठा न्यूज जबाबदार नसून, संबंधित वार्ताहर, लेखक किंवा जाहिरातदारच आहे. युवा मराठा आँनलाईन वेब न्युज पोर्टल कुठलीही जबाबदारी घेत नाही. शिवाय वादविवाद हे मालेगांव, जि.नाशिक न्यायालयाअंतर्गतच चालविले जातील. भारत सरकारने फेब्रुवारी 2021 पासून अधिसूचित केलेल्या नव्या माहिती तंत्रज्ञान (मध्यस्थ मार्गदर्शक सूचना आणि डिजिटल माध्यमांसाठीची आचार संहिता) नियम 2021 अंतर्गत असलेल्या डिजिटल माध्यमांसाठीच्या आचार संहितेचे आम्ही पालन करतो. तरीही एखाद्या बातमीविषयी आपली तक्रार असल्यास आमच्या वेब माध्यमचे तक्रार निवारण अधिकारी आणि स्वनियमन संस्थेकडे विहित नमुन्यात अर्ज करू शकता. आपल्या तक्रारीचे निराकरण केले जाईल.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here