राजेंद्र पाटील राऊत
EWS मुळे आरक्षण न मिळाल्यास अशोक चव्हाण जबाबदार
मराठा आरक्षणाच्या मुद्यावर सध्या राज्यात राजकीय आणि सामाजिक पटलावर मराठा आरक्षणावरून टीकाटिप्पणी चालू आहे. सर्वच मराठा संघटना आक्रमक होत आहेत. आता अशातच EWS आरक्षणावरून मराठा समाज पुन्हा एकदा आक्रमक झाला आहे. EWS मुळे आरक्षण न मिळाल्यास अशोक चव्हाण जबाबदार असतील, असे म्हणत मराठा समाजाच्या वतीने गंभीर इशारा देण्यात आला आहे.
मराठा क्रांती मोर्चाचे आंदोलक दिलीप पाटील यांनी पत्रकार परिषदेत स्पष्ट सांगितले की, मराठा उपसमितीचा अशोक चव्हाण यांनी तातडीने राजीनामा द्यावा. वडेट्टीवार आणि भुजबळ हे समतेची शपथ विसरले आहेत , एकाच जातीसाठी त्यांचा लढा आहे. राज्यपालांकडे वडेट्टीवार आणि भुजबळ यांची तक्रार करणार असून राजीनामा न दिल्यास त्यांच्या घरासमोर तीव्र आंदोलन छेडणार आहोत.
यावेळी श्रीमंत कोकाटे यांनीही राज्य सरकारवर हल्लाबोल केला. ‘सर्वेच्च न्यायालयाने दिलेली स्थगिती उठवण्यासाठी प्रयत्न करण्याऐवजी ज्या EWS आरक्षणाची मागणी केलेलीच नव्हती ते आरक्षण देऊन महाविकास आघाडीने मराठा समाजाची फसवणूक केली व पाठीत खंजीर खुपसला आहे’, असा आरोप त्यांनी केला.
युवा मराठा न्यूज नेटवर्क .